शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

आगरगावात घरांसह शाळेचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST

रविवारी सायकांळी सातच्या सुमारास देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख), लोणी, फत्तेपूर व नागझरी यासह काही भागांत वादळी वाºयासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. आगरगाव परिसरातील गावांमध्ये वादळी पावसाने अनेकांच्या घरांचे व यशवंत विद्यालयाच्या इमारतीचे नुकसान केले.

ठळक मुद्देटिनपत्रे उडाले : परिसरातील अनेक गावांत पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कआगरगाव : उकाड्याने हैराण झालेल्या आगरगावकरांना रविवारी काहीसा दिलासा मिळाला; मात्र रविवारी सांयकाळी सातच्या सुमारास गावासह परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरांसह शाळेचे नुकसान झाले.मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. एवढेच नव्हे, तर सकाळी गारवा, दुपारी प्रखर उष्णतामान आणि रात्री पाऊस असा काहीसा बदल जिल्ह्यातील काही गावांनी अनुभवला. मात्र रविवारी सायकांळी सातच्या सुमारास देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख), लोणी, फत्तेपूर व नागझरी यासह काही भागांत वादळी वाºयासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. आगरगाव परिसरातील गावांमध्ये वादळी पावसाने अनेकांच्या घरांचे व यशवंत विद्यालयाच्या इमारतीचे नुकसान केले.रविवारी सांयकाळी सहा वाजल्यापासूनच गावासह परिसरात जोरदार वारे वाहू लागले होते. त्यामुळे पाऊस येणार असा अंदाज बांधला होता. तो खरा ठरला.आर्वीसह तालुक्याला वादळी पावसाचा तडाखाआर्वी : रविवारी रात्री आर्वीसह तालुक्यातील गावांना वादळी वाºयासह पावसाने तडाखा दिला. दरम्यान अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी, जळगाव, शिरपूर, टाकरखेडा, देऊरवाडा, टोणा, लाडेगाव, सर्कसपूर, राजापूर, निंबोली (शेंडे), अहिरवाडा, वाठोडा, वागदा, खुबगाव, नांदपूर, पाचेगाव, दहेगाव (म.), पिंपळखुटा, गुमगाव, चिंचोली (डांगे), वाढोणा, बेढोणा, सावळापूर, धनोडी, मांडला आदी गावात वादळीवाऱ्याने चांगलेच थैमान घातले. तालुक्यातील निंबोली येथील शेतातील गोठा, झाडे उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्याच्या शेतातील साहित्य वादळी वाऱ्याने उडून गेले. आर्वीतील काही वॉर्डात वादळी पावसाने झाडे पडली. रात्री उशिरापर्यंत तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती.रोहणा परिसरात शेतकऱ्यांची दाणादाणरोहणा : परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आकाशात एकदम काळे ढग दाटून आले आणि वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलीत तर शेतातील गोठ्यांची पडझड झाली. वादळी पावसाने मोठे नुकसान झाले नसले तरी दर दोन-तीन दिवसांनी येणाऱ्या वादळी पावसाने जमीन कशी तापेल, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. गोपालकांची वादळीवारा, पाऊस व विजांपासून जनावरांचे रक्षण करताना दाणादाण होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस