शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

बसफेऱ्यांअभावी नागरिकांसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे.  परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कतारासावंगा : परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेकांना पर्याय नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. यामुळे खासगी वाहनाचे मालक अव्वाच्या सव्वा दर आकारून नागरिक व विद्यार्थ्यांची सर्रास लूट करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या दिवसात आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात. खासगी वाहनाव्यतिरिक्त पर्याय नसल्याने नागरिकांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना गाडीत डांबून बसविले जाते. यामुळे अपघाताचा धोकाही बळावला आहे. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अनेक नागरिकांना ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बंदचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसून येते.  काही विद्यार्थी तर चक्क पायदळ किंवा सायकलने शाळेपर्यंत अंतर गाठताना दिसतात. हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडीत विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यासाठी सकाळपासूनच खासगी वाहनाच्या प्रतीक्षेत बसावे लागते. प्रवासाचे दरही दीड-दोन पट वाढल्याने हातमजुरी, शेती करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोग्या नाही. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर एवढा मोठा संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याने आता तरी आमची लालपरी सुरू व्हायला हवी अशी मागणी सर्व स्तरातून होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बसफेरी बंद असल्याने दररोज खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. वेळेवर शाळेत देखील पोहोचता येत नाही.  खासगी वाहनात एक प्रकारचे मोठे संकट डोक्यावर घेऊनच प्रवास करावा लागतो. प्रवासाचे भाडेही ठरले नाही. त्यामुळे आमची लूट चालवली जात आहे.- भावना गावंडे, विद्यार्थिनी.

बंद बसफेऱ्या अभावी दररोज मुलांना शाळेत खासगी वाहनाने पाठवावे लागते. त्यामुळे मुले शाळेतून परत घरी येईपर्यंत मनात एक प्रकारची भीती असते.- अरुण वंजारी, पालक.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप