शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
4
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
7
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
8
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
9
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
10
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
11
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
12
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
13
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
14
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
15
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
16
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
17
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
18
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
19
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
20
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?

बसफेऱ्यांअभावी नागरिकांसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे.  परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कतारासावंगा : परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेकांना पर्याय नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. यामुळे खासगी वाहनाचे मालक अव्वाच्या सव्वा दर आकारून नागरिक व विद्यार्थ्यांची सर्रास लूट करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या दिवसात आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात. खासगी वाहनाव्यतिरिक्त पर्याय नसल्याने नागरिकांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना गाडीत डांबून बसविले जाते. यामुळे अपघाताचा धोकाही बळावला आहे. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अनेक नागरिकांना ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बंदचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसून येते.  काही विद्यार्थी तर चक्क पायदळ किंवा सायकलने शाळेपर्यंत अंतर गाठताना दिसतात. हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडीत विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यासाठी सकाळपासूनच खासगी वाहनाच्या प्रतीक्षेत बसावे लागते. प्रवासाचे दरही दीड-दोन पट वाढल्याने हातमजुरी, शेती करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोग्या नाही. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर एवढा मोठा संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याने आता तरी आमची लालपरी सुरू व्हायला हवी अशी मागणी सर्व स्तरातून होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बसफेरी बंद असल्याने दररोज खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. वेळेवर शाळेत देखील पोहोचता येत नाही.  खासगी वाहनात एक प्रकारचे मोठे संकट डोक्यावर घेऊनच प्रवास करावा लागतो. प्रवासाचे भाडेही ठरले नाही. त्यामुळे आमची लूट चालवली जात आहे.- भावना गावंडे, विद्यार्थिनी.

बंद बसफेऱ्या अभावी दररोज मुलांना शाळेत खासगी वाहनाने पाठवावे लागते. त्यामुळे मुले शाळेतून परत घरी येईपर्यंत मनात एक प्रकारची भीती असते.- अरुण वंजारी, पालक.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप