शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोरानाने सगेसोयरेही दुरावले, मृतदेहाला शिवण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 11:04 IST

ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मानवी हक्काचे उल्लंघनच असल्याने मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे कोविडची अवास्तव भीती दूर करण्याची गरज

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ चा देशात शिरकाव झाला आणि अवास्तव भीतीचा डोंब उठविण्यात आला. कोरोना विषाणूने कुणाचा पती, कुणाची पत्नी, कुणाची आई, कुणाचे वडील तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. ज्यांनी आपल्या परिवारात आपल्या आठवणी कायम ठेवल्यात, ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मानवी हक्काचे उल्लंघनच असल्याने मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी देशात अनेक संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्यावेळीही जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उपाययोजनांप्रमाणेच सूचना दिल्या होत्या. तेव्हाही आजाराच्या संक्रमणात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. मात्र, आता सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांच्या व्यापकतेमुळे कोरोनाची भयावह स्थिती निर्माण करण्यात आली. प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाबत अतिजागरुक झाल्याने जीवाच्या भीतीपोटी जिवलगांना दूर सारू लागली आहे. रक्ताचे नातेही दुरावल्याने परकीयांनी किंवा प्रशासनाने स्वीकार केल्याचेही पुढे आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला समाजाने अघोषित बहिष्कृत केल्याचीही उदाहरणे आहेत. यावरच न थांबता कोरोनाबाधित मृतदेहाचे भारतीय लोकांनी अंत्यसंस्कार रोखण्याच्या अनेक त्रासदायक घटना देशभरात घडल्याची नोंद आहे. कोरोनाच्या अनाठायी भीतीपोटी नातेवाईक सुद्धा रुग्णालयाने सरकारी नियमानुसार योग्यप्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहाला रुग्णवाहिका किंवा व्हॅनमध्ये हलविताना तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह सरणावर (चितेवर) ठेवताना किंवा दफन करताना स्पर्श करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णालयीन परिचारक व पोलिसांना ही कामे करावी लागत आहेत. मृतदेहापासून कोणताही धोका नाही, हे पटवून देत नागरिकांच्या मनामधील कोरोनाची भीती दूर करून कोरोनासोबत लढायला शिकविण्याची गरज व्यक्त होत आहे.

मृतदेहाला स्पर्श करण्याची मागितली परवानगीकोविडने संक्रमित असलेल्या मृतदेहापासून खूप धोका असतो, ही अकारण भीती दूर करण्यासाठी वर्धा येथील न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी डॉक्टरांनी सरकारी नियमानुसार योग्यप्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहास कोविड रुग्णालयात किंवा स्मशानभूमीत पीपीईविना स्पर्श करण्याची संमती मागितली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे. विविध प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित (उदा. एच.आय. व्ही, टी.बी., इन्फ्युएन्झा इत्यादी.) असलेल्या मृतदेहांशी शवविच्छेदनादरम्यान वारंवार संपर्क येतो. काही ठिकाणी सरकारने कोविड संक्रमित मृतदेह स्मशानभूमीत हाताळण्यासाठी पीपीई घालून परिचारक नियुक्त केले आहेत. परंतु, त्यामुळे रुग्णालयाने सरकारी नियमानुसार योग्य प्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहापासूनसुद्धा खूप धोका आहे, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.रुग्णालयाने योग्यरितीने संपूर्णपणे पॅक केलेल्या मृतदेहाला स्पर्श केल्यामुळे कुठलाही धोका नाही. तसेच अशा पॅक केलेल्या मृतदेहाला हाताळण्यासाठी पीपीईचीसुद्धा गरज नाही. केवळ मृतदेहाशी प्रत्यक्ष संपर्क येणे व त्याचे चुंबन वैगेरे घेणे टाळणे अपेक्षित आहे. याची माहिती जनतेला देऊन जनजागृती करण्याची गरज आहे.डॉ. इंद्रजित खांडेकर, न्यायवैद्यक तज्ज्ञ, सेवाग्राम.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस