शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरानाने सगेसोयरेही दुरावले, मृतदेहाला शिवण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 11:04 IST

ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मानवी हक्काचे उल्लंघनच असल्याने मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे कोविडची अवास्तव भीती दूर करण्याची गरज

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ चा देशात शिरकाव झाला आणि अवास्तव भीतीचा डोंब उठविण्यात आला. कोरोना विषाणूने कुणाचा पती, कुणाची पत्नी, कुणाची आई, कुणाचे वडील तर कुणाचे भाऊ-बहीण दगावले. ज्यांनी आपल्या परिवारात आपल्या आठवणी कायम ठेवल्यात, ज्यांनी परिवारातील संकटाचा भार आजवर पेलला तेच कोरोनाच्या महामारीत एकटे पडले. इतके एकटे, की त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सग्यासोयऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे शासकीय यंत्रणेलाच आपापल्या परीने मृतदेहाची विल्हेवाट लावावी लागली. मृतदेहाला न शिवणे हे मानवी हक्काचे उल्लंघनच असल्याने मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.कोरोना विषाणूच्या संक्रमणापूर्वी देशात अनेक संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्यावेळीही जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या उपाययोजनांप्रमाणेच सूचना दिल्या होत्या. तेव्हाही आजाराच्या संक्रमणात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. मात्र, आता सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांच्या व्यापकतेमुळे कोरोनाची भयावह स्थिती निर्माण करण्यात आली. प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाबत अतिजागरुक झाल्याने जीवाच्या भीतीपोटी जिवलगांना दूर सारू लागली आहे. रक्ताचे नातेही दुरावल्याने परकीयांनी किंवा प्रशासनाने स्वीकार केल्याचेही पुढे आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला समाजाने अघोषित बहिष्कृत केल्याचीही उदाहरणे आहेत. यावरच न थांबता कोरोनाबाधित मृतदेहाचे भारतीय लोकांनी अंत्यसंस्कार रोखण्याच्या अनेक त्रासदायक घटना देशभरात घडल्याची नोंद आहे. कोरोनाच्या अनाठायी भीतीपोटी नातेवाईक सुद्धा रुग्णालयाने सरकारी नियमानुसार योग्यप्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहाला रुग्णवाहिका किंवा व्हॅनमध्ये हलविताना तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह सरणावर (चितेवर) ठेवताना किंवा दफन करताना स्पर्श करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे रुग्णालयीन परिचारक व पोलिसांना ही कामे करावी लागत आहेत. मृतदेहापासून कोणताही धोका नाही, हे पटवून देत नागरिकांच्या मनामधील कोरोनाची भीती दूर करून कोरोनासोबत लढायला शिकविण्याची गरज व्यक्त होत आहे.

मृतदेहाला स्पर्श करण्याची मागितली परवानगीकोविडने संक्रमित असलेल्या मृतदेहापासून खूप धोका असतो, ही अकारण भीती दूर करण्यासाठी वर्धा येथील न्यायवैद्यक तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी डॉक्टरांनी सरकारी नियमानुसार योग्यप्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहास कोविड रुग्णालयात किंवा स्मशानभूमीत पीपीईविना स्पर्श करण्याची संमती मागितली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे. विविध प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित (उदा. एच.आय. व्ही, टी.बी., इन्फ्युएन्झा इत्यादी.) असलेल्या मृतदेहांशी शवविच्छेदनादरम्यान वारंवार संपर्क येतो. काही ठिकाणी सरकारने कोविड संक्रमित मृतदेह स्मशानभूमीत हाताळण्यासाठी पीपीई घालून परिचारक नियुक्त केले आहेत. परंतु, त्यामुळे रुग्णालयाने सरकारी नियमानुसार योग्य प्रकारे पॅक करून दिलेल्या मृतदेहापासूनसुद्धा खूप धोका आहे, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.रुग्णालयाने योग्यरितीने संपूर्णपणे पॅक केलेल्या मृतदेहाला स्पर्श केल्यामुळे कुठलाही धोका नाही. तसेच अशा पॅक केलेल्या मृतदेहाला हाताळण्यासाठी पीपीईचीसुद्धा गरज नाही. केवळ मृतदेहाशी प्रत्यक्ष संपर्क येणे व त्याचे चुंबन वैगेरे घेणे टाळणे अपेक्षित आहे. याची माहिती जनतेला देऊन जनजागृती करण्याची गरज आहे.डॉ. इंद्रजित खांडेकर, न्यायवैद्यक तज्ज्ञ, सेवाग्राम.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस