शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड झालीय बेलगाम

By admin | Updated: February 11, 2015 01:40 IST

वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या गरजा अमर्याद असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शासकीय संपत्ती असलेल्या जंगलात खुलेआम वृक्षतोड सुरू आहे.

अमोल सोटे आष्टी (शहीद)वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या गरजा अमर्याद असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. शासकीय संपत्ती असलेल्या जंगलात खुलेआम वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारीच प्रोत्साहीत करीत असल्याची ओरड होत आहे़वर्धा जिल्ह्यात उपलब्ध एकूण वनापैकी ६५ टक्के वन आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात आहे. या जंगलांत साग, खैर यासह विविध प्रजातीचे वृक्ष आहेत़ मौल्यवान वनसंपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी वनसंरक्षण समित्या, वनविभागाकडे आहे; पण त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत असल्याचे दिसते़ नदीकाठावरील मोठी झाडे दिवसाढवळ्या तोडली जात आहेत़ बाभुळ, आंबा, निंब या झाडांचीही कत्तल होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर असलेली झाडे कमी पैशात विकत घेऊन परिसरातील झाडे तोडली जात आहे. झाडांच्या कत्तलीमुळे प्रदूषण होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे़ हे नुकसान कसे भरून निघेल, हा प्रश्नच आहे़ जंगलात प्राण्यांची सुरक्षितता राहिली नाही. यामुळे अनेक प्राण्यांचा बळी जात आहे.आष्टी वनपरिक्षेत्रात एकूण पाच वाघ आहेत़ यात दोन मोठे तर तीन बिबट आहेत़ या पाचही वाघांना सुरक्षितता नसल्याने ते शिकाऱ्यांच्या रडारवर आहे. जंगलाशेजारील भागात तारांचे कुंपण लावून वीज खांबावरून वीज प्रवाह देऊन त्यात प्राणी अडकून मरतात. मृत प्राण्यांचे मांस विकले जाते़ प्राण्यांवर प्रेम करण्याऐवजी त्यांची शिकार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. रोही, हरीण, ससा, मोर या प्राण्यांची शिकार केली जात आहे. प्राणी गणनेनंतर सुरक्षा वाढविण्यासाठी वनविभागाचा कल दिसत नाही. आष्टी-थार-पार्डी रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. यात सुरक्षित वन असून वनविभागाने तारेचे कुंपण करणे गरजेचे आहे़