शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

साटोडा-आलोडीत कचराकोंडी; घंटागाडी झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 18:03 IST

नागरिकांमध्ये रोष: जागेअभावी निर्माण झाली समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायत परिसरात गेल्या महिन्याभरापासून घंटागाडी बंद असल्याने कचरा संकलनाचे काम थांबले आहे. त्यामुळे आता नागरिकही मिळेल तिथे कचरा टाकत असल्याने आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कचरा संकलनाकरिता व विल्हेवाट लावण्याकरिता स्वतंत्र जागा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असून, या सर्व सोयी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतींचीही अडचण होत आहे. पूर्वी साटोडा-आलोडी परिसरातील नागरिकांच्या घराघरातून कचऱ्याचे घंटागाडीद्वारे संकलन केले जायचे. प्रत्येक वॉर्डातील कचरा संकलन करण्याकरिता ग्रामपंचायतीकडे घंटागाड्या उपलब्ध आहे.

घंटागाड्यांद्वारे संकलित केलेला कचरा हा बायपासलगतच्या सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील कंचरा डेपोत टाकला जात होता. परंतु या ठिकाणी इतरही ग्रामपंचायतीचा कचरा टाकायला सुरुवात झाली. तसेच कॅटर्सचालकही शिळे अन्न येथेच टाकायला लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरायला लागली. त्यामुळे सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) ग्रामपंचायतींनी या परिसरात कचरा टाकण्यास मनाई केल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतः कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करणे भाग पडले. 

परिणामी साटोडा-आलोडी ग्रामपंचायतीसमोरही ही समस्या उभी ठाकल्याने कचरा संकलनाचे कामच ठप्प करण्यात आले. त्यामुळे आता गेल्या महिन्याभरापासून कचरा संकलन बंद असल्याने घरोघरी कचरा साचला आहे. नागरिकही आता मिळेल त्या जागेवर कचरा टाकायला लागल्याने परिसरात अस्वच्छता वाढायला लागली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता परिसरातील नागरिक दुचाकीवरून कचरा पोत्यामध्ये नेत इतरत्र फेकत आहे. यातही संबंधित भागातील रहिवासी कचरा टाकण्यास विरोध दर्शवत असल्याने कचरा टाकावा तरी कोठे? असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने व्यवस्था करण्याची मागणी गजानन गुजरकर, सुधीर पोळ, पंकज शिवणकर, अनिकेत नेटके, बी. टी. घनोकार, श्याम शिवणकर, डॉ. संदीप काळे, निर्भय कुंवर, बळवंत पिंपळकर, मंगेश निकोडे यांच्यासह परिसरातील इतरही नागरिकांनी केली आहे

परिसरात समस्यांचा विळखाग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा कांगावा केला जात असला तरीही समस्यांचा विळखा कायम आहे. नाल्यांचे सदोष व अर्धवट बांधकाम केल्याने घाणीचे साम्राज्य कायम आहे. यातून डेंग्यू आजाराची साथ पसरण्याचीही शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. वॉर्डातील रस्त्यांवर रात्रीचा काळोख असतो तसेच अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अंजनामाता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाचे सदोष बांधकाम करण्यात आले आहे. परिणामी, थोड्याच पावसात पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. अयोध्यानगर वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नालीचे सदोष बांधकाम करण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक समस्या असून, त्याची सोडवून करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बैठक झाली आहे. त्यांनी येत्या दोन-तीन दिवसांत नियोजन करून कचरा संकलनाचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले आहे. लवकरच कचरा संकलन- विल्हेवाटीचा प्रश्न निकाली काढला जाईल. - बादल विरुटकर, सरपंच, साटोडा.

पाणीटंचाईची झळ■ साटोडा-आलोडी परिसरात नळयो- जनेद्वारे तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा होतो त्या दिवशी नळावर सर्रास मोटरपंप लावले जात असल्याने अनेकांना थेंबभरही पाणी मिळत नसून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

एक महिन्यापासून घंटागाडी बंद असून, यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असताना ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेऊन आहे.- गौरव गावंडे, सदस्य

टॅग्स :wardha-acवर्धा