शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

साटोडा-आलोडीत कचराकोंडी; घंटागाडी झाली बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 18:03 IST

नागरिकांमध्ये रोष: जागेअभावी निर्माण झाली समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या साटोडा-आलोडी ग्रामपंचायत परिसरात गेल्या महिन्याभरापासून घंटागाडी बंद असल्याने कचरा संकलनाचे काम थांबले आहे. त्यामुळे आता नागरिकही मिळेल तिथे कचरा टाकत असल्याने आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.

लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कचरा संकलनाकरिता व विल्हेवाट लावण्याकरिता स्वतंत्र जागा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असून, या सर्व सोयी सुविधा पुरविताना ग्रामपंचायतींचीही अडचण होत आहे. पूर्वी साटोडा-आलोडी परिसरातील नागरिकांच्या घराघरातून कचऱ्याचे घंटागाडीद्वारे संकलन केले जायचे. प्रत्येक वॉर्डातील कचरा संकलन करण्याकरिता ग्रामपंचायतीकडे घंटागाड्या उपलब्ध आहे.

घंटागाड्यांद्वारे संकलित केलेला कचरा हा बायपासलगतच्या सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील कंचरा डेपोत टाकला जात होता. परंतु या ठिकाणी इतरही ग्रामपंचायतीचा कचरा टाकायला सुरुवात झाली. तसेच कॅटर्सचालकही शिळे अन्न येथेच टाकायला लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरायला लागली. त्यामुळे सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) ग्रामपंचायतींनी या परिसरात कचरा टाकण्यास मनाई केल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतः कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करणे भाग पडले. 

परिणामी साटोडा-आलोडी ग्रामपंचायतीसमोरही ही समस्या उभी ठाकल्याने कचरा संकलनाचे कामच ठप्प करण्यात आले. त्यामुळे आता गेल्या महिन्याभरापासून कचरा संकलन बंद असल्याने घरोघरी कचरा साचला आहे. नागरिकही आता मिळेल त्या जागेवर कचरा टाकायला लागल्याने परिसरात अस्वच्छता वाढायला लागली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता परिसरातील नागरिक दुचाकीवरून कचरा पोत्यामध्ये नेत इतरत्र फेकत आहे. यातही संबंधित भागातील रहिवासी कचरा टाकण्यास विरोध दर्शवत असल्याने कचरा टाकावा तरी कोठे? असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने व्यवस्था करण्याची मागणी गजानन गुजरकर, सुधीर पोळ, पंकज शिवणकर, अनिकेत नेटके, बी. टी. घनोकार, श्याम शिवणकर, डॉ. संदीप काळे, निर्भय कुंवर, बळवंत पिंपळकर, मंगेश निकोडे यांच्यासह परिसरातील इतरही नागरिकांनी केली आहे

परिसरात समस्यांचा विळखाग्रामपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा कांगावा केला जात असला तरीही समस्यांचा विळखा कायम आहे. नाल्यांचे सदोष व अर्धवट बांधकाम केल्याने घाणीचे साम्राज्य कायम आहे. यातून डेंग्यू आजाराची साथ पसरण्याचीही शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. वॉर्डातील रस्त्यांवर रात्रीचा काळोख असतो तसेच अनेक भागांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अंजनामाता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाचे सदोष बांधकाम करण्यात आले आहे. परिणामी, थोड्याच पावसात पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होते. अयोध्यानगर वॉर्ड क्रमांक दोनमध्ये नालीचे सदोष बांधकाम करण्यात आल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक समस्या असून, त्याची सोडवून करावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बैठक झाली आहे. त्यांनी येत्या दोन-तीन दिवसांत नियोजन करून कचरा संकलनाचा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन दिले आहे. लवकरच कचरा संकलन- विल्हेवाटीचा प्रश्न निकाली काढला जाईल. - बादल विरुटकर, सरपंच, साटोडा.

पाणीटंचाईची झळ■ साटोडा-आलोडी परिसरात नळयो- जनेद्वारे तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा होतो त्या दिवशी नळावर सर्रास मोटरपंप लावले जात असल्याने अनेकांना थेंबभरही पाणी मिळत नसून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

एक महिन्यापासून घंटागाडी बंद असून, यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. सध्या डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण असताना ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेऊन आहे.- गौरव गावंडे, सदस्य

टॅग्स :wardha-acवर्धा