शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
2
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
3
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
4
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
5
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
6
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
7
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
8
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
9
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
10
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
11
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
12
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
13
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
14
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
15
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
16
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
17
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
18
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
19
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
20
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

अंत्यसंस्कार; तारासावंगा नि:शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 5:00 AM

गाडेगाव येथील दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये नावेच्या साहाय्याने जात असताना ११ जण नाव उलटल्याने नदी पात्रात बुडाले. यामध्ये तारासावंगा येथील  आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोनाली सुखदेव खंडाळे (१२), आश्विनी अमर खंडाळे (२१) व नवदाम्पत्य वृषाली अतुल वाघमारे (१९) आणि अतुल गणेश वाघमारे (२५) यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतारासावंगा : अमरावती जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धानदीच्या पात्रात नाव उलटल्याने ११ जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये तारासावंगा येथील पाच जणांचा समावेश असून तब्बल दोन दिवसांनंतर गुरुवारी पाचही जणांचे मृतदेह सापडले. याची माहिती गावात पोहोचताच नागरिकांनी नदीतीरावर धाव घेतली. शोकमग्न वातावरणात मृतदेह गावात आणून त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याची गावातील ही पहिलीच घटना असून संपूर्ण गाव नि:शब्द झाले होते.गाडेगाव येथील दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र झुंज येथील वर्धा नदीच्या पात्रामध्ये नावेच्या साहाय्याने जात असताना ११ जण नाव उलटल्याने नदी पात्रात बुडाले. यामध्ये तारासावंगा येथील  आदिती सुखदेव खंडाळे (१३), मोनाली सुखदेव खंडाळे (१२), आश्विनी अमर खंडाळे (२१) व नवदाम्पत्य वृषाली अतुल वाघमारे (१९) आणि अतुल गणेश वाघमारे (२५) यांचा समावेश आहे. घटनेनंतर गावात एकच धावपळ उडाली. जिल्हा प्रशासनाने यंत्रणा कामाला लावून शोधमोहीम सुरू केली. राज्य आपत्ती विभागाच्या चमूकडून लागलीच शोध कार्य सुरू केले असता गुरुवारी सकाळी साडेपाच वाजतापासून राबविलेल्या मोहिमेदरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत आदिती खंडाळे, आश्विनी खंडाळे, वृषाली वाघमारे आणि अतुल वाघमारे या चौघांचे मृतदेह सापडले. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावावर दु:खाचा डोेंगर कोसळला. गावकऱ्यासह नातलगांनी घटनास्थळी धाव घेवून एकच हंबरडा फोडला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशामुळे सर्वत्र स्मशानशांतता पसरली होती. दुपारी चौघांचेही मृतदेह गावात आणल्यानंतर दोन सरणावर चौघांचे अंतिमसंस्कार करण्यात आला. या अंत्यसंस्काराकरिता वर्धा, अमरावती व नागपूर जिल्ह्यासह पंचक्रोशितील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास मोनाली खंडाळे हिचाही मृतदेह सापडल्याने तिच्यावरही सायंकाळी भर पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेनंतर गेल्या दोन दिवसांपासून गावात एकाही घरी चूल पेटली नाही. पाचही जणांचे मृतदेह मिळेपर्यंत गावकऱ्यांनी अक्षरश: उपवासच केला होता. 

रुग्णवाहिकेतून झाले मुखदर्शन- गुरुवारी दुपारी चौघांचे मृतदेह गावात आणण्यात आले. मृतदेहांचे शवविच्छेदन केले असल्याने आई-वडिलांसह नातलगांना रुग्णवाहिकेतूनच मृतदेहांचे मुखदर्शन घेतले. यावेळी आक्रोशाने परिसर दणाणून गेला होता. हे दृश्य पाहून उपस्थितांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. रुग्णवाहिकेतूनच मृतदेह गावातील भडक नाल्याच्या काठावर नेण्यात आले. तेथे दोन सरणावर चारही मृतदेहांना मुखाग्नी देण्यात आला.  या अंत्यसंस्काराला जि. प. सदस्य अंकिता होले, जि. प. सदस्य  त्रिलोकचंद कोहळे, उपसभापती गोविंद खंडाळे, गटविकास अधिकारी बारापात्रे, आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक देरकर, सचिन होले, गजानन भोरे, पोलीस पाटील अंजली कडू, सरपंच शीतल खंडाळे, विस्तार अधिकारी वानखेडे, अमर गोरे, आशिष फडफड, देवानंद पेठे, प्रशांत काकपुरे, ग्रामसेवक कटकतलवारे, माधव मानमोडे तसेच गावातील शिक्षक व नागरिक उपस्थित होते. 

नवदाम्पत्याच्या आयुष्याचा शेवटही सोबतीनेच...    nमहिन्याभरापूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या अतुल व रूपाली वाघमारे परिवारासोबत दशक्रियेच्या कामाला गेले होते. नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवित नावेतून प्रवास करीत असतानाच नाव उलटली आणि स्वप्नांचाही चुराडा झाला. नियतीच्या या घाताने दोघांचाही सोबतच शेवट झाला. त्यामुळे मृतदेह सापडल्यानंतर दोघांवरही एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

झुंज येथील घटनेत माझ्या दोन्ही मुली पाण्यात बुडाल्या. मोठी आदिती आणि लहान मोनाली दोघीही अभ्यासू आणि परिवाराच्या फार लाडक्या होत्या. मी हातमजुरी करून दोन्ही मुलींचा सांभाळ केला. पण, आता त्याच नसल्याने घराचं घरपण हिरावून गेलं आहे. आमचा मोठा आधार अचानक निघून गेल्याने या दु:खातून कसे सावरणार? - सुखदेव खंडाळे, मोनाली व आदितीचे वडील

 

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात