कौटुंबिक वादातून मुलाकडून वडिलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:12+5:30
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रवींद्र बाबरे हे मद्य प्राशन करून घरी आले आणि शेतात पेरणी केलेले तुरीचे बियाणे का निघाले नाही, असे म्हणून पत्नीला मारहाण करू लागले. दरम्यान मुलगा पीयूष बाबरे हा आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी गेला असता रवींद्रने त्यालाही मारहाण केली. दोघांमध्ये चांगलाच वाढ उफाळला. रागाच्या भारात पीयूषने रवींद्रवर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.): कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत मुलाने वडिलांच्या शरीरावर धारदार शस्त्रााने वार करीत त्यांचा खून केला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बेलोरा (जळगाव) येथे ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी मुलाला तळेगाव पोलिसांनी अटक केली असून मृतदेह आर्वी येथे उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
रवींद्र साहेबराव बाबरे (५२) असे मृताचे नाव असून आरोपी मुलगा पीयूष बाबरे (२०) यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, बेलोरा येथील रविंद्र बाबरे हे पत्नी व दोन मुलांसह राहायचे. त्यांचा शिवणकाम करण्याचा व्यवसाय होता. रविंद्रला दारूचे व्यसन होते. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. रवींद्र हे दररोज मद्य प्राशन करून घरात वाद घालीत असे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रवींद्र बाबरे हे मद्य प्राशन करून घरी आले आणि शेतात पेरणी केलेले तुरीचे बियाणे का निघाले नाही, असे म्हणून पत्नीला मारहाण करू लागले. दरम्यान मुलगा पीयूष बाबरे हा आईला वाचविण्यासाठी मध्यस्थी गेला असता रवींद्रने त्यालाही मारहाण केली. दोघांमध्ये चांगलाच वाढ उफाळला. रागाच्या भारात पीयूषने रवींद्रवर धारदार शस्त्राने वार करीत त्यांची हत्या केली. याची माहिती तळेगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृत रविंद्र बाबरे यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी मुलगा पियूष बाबरे यास रात्रीच अटक केली. पुढील तपास ठाणेदार रविकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक धीरज राजुरकर, आशिष नेवारे, रूपेश उगेमुगे, अनिल ढाकणे, मनोज आसोले करीत आहेत.
मृत वर्षभरापूर्वीच आला कारागृहाबाहेर
मृतक रविंद्र बाबरे याने २००७ मध्ये कौटुंबिक वादातून आईचा खून केला होता. याप्रकरणी मृत रवींद्र हा तब्बल ११ वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होता. वर्षभरापूर्वीच रवींद्र कारागृहातून बाहेर पडत गावात आला होता. त्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले होते. मद्यधुंद अवस्थेत तो नेहमीच कुटुंबीयांशी वाद घालत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.