शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
8
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
9
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
10
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
11
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
12
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
13
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
14
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
15
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
16
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
20
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी उतरविला १४.४८ कोटींचा पीक विमा

By admin | Updated: November 14, 2016 00:53 IST

हवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे.

८० हजार १२५ प्रकरणे : ९७,०९३ हेक्टर क्षेत्राचा समावेश
प्रशांत हेलोंडे  वर्धा
हवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे. जिल्ह्यातील कर्जदार आणि गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा रिलायन्स या विमा कंपनीकडून काढला जात आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात सुमारे ५६ हजारांवर कर्जदार तर ५ हजार २८८ गैरकर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी तब्बल १४ कोटी ४८ लाख रुपयांचा पीक विमा काढलेला आहे. यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात नुकसान सहन करावे लागल्याने त्यांनी विमा परताव्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे.
विदर्भातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. काही वर्षांत सिंचन क्षेत्रात वाढ झाली असली तरी पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा शेतातील पिकांवर परिणाम होतो. यामुळेच शासनाकडून पीक विमा योजना राबविल्या जातात. पूर्वी हवामान आधारित पीक विमा योजना होती. आता पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना एकदाच विमा हप्ता भरावा लागतो. पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले तरी विम्याच्या परताव्यासाठी प्रस्ताव सादर करता येतो. यासाठी कृषी विभागाच्यावतीने विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या हजेरीत सर्वेक्षण केले जाते. सदर प्रतिनिधी उपलब्ध होत नसल्यास कृषी विभागाचे सर्वेक्षण ग्राह्य धरले जाते. या सुविधेमुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना तर पिकांचा विमा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे; पण जिल्ह्यात गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही विमा उतरविल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५६ हजारांवर शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची रक्कम वेगवेगळी असल्याने एका शेतकऱ्याची दोन ते तीन वेळा नोंद होत असल्याचे लीड बँकेकडून सांगण्यात आले आहे. हा आकडा विचारात घेतला तर जिल्ह्यातील ९१ हजार ५९५.८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढण्यात आला आहे. यासाठी ७४ हजार ८३७ प्रकरणांमध्ये कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी १३ कोटी ७६ लाख, ४५ हजार ९४३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. गैरकर्जदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा योजनेचा लाभ घेतला आहे. यात ५ हजार २८८ शेतकऱ्यांनी आपल्या ५ हजार ४९७.७५८ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ७२ लाख १२ हजार ७१३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. एकूण जिल्ह्यातील ८० हजार १२५ प्रकरणांमध्ये १४ कोटी ४८ लाख ५८ हजार ६५६ रुपयांचा विमा हप्ता संबंधित कंपनीला अदा करण्यात आला आहे.
विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाईची हमी मिळाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले आणि शासकीय यंत्रणेने पंचनामाच केला नाही तर शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळणे कठीण होते. यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देण्याकरिता कृषी विभाग, महसूल विभाग आणि विमा कंपनीने पूढाकार घेत नुकसानाचा पंचनामा करून घेत सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.