शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसगाड्यांचे व्यापक निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.

ठळक मुद्देसंख्येत मोठी कपात : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना (कोव्हिड-१९) या विषाणूचा वर्धा जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत प्रसार होऊ नये म्हणून शासन व प्रशासनस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची प्रत्येक बस निर्जंतूक करण्यात येत आहे. असे असले तरी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच बसस्थानकावर गर्दी करू नये असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव व तळेगाव हे रापमचे पाच आगार आहेत. या पाचही आगारात एकूण २५० बसेस आहेत. याच बसेस ग्रामीण आणि शहरी प्रवााशांच्या सेवेसाठी प्रभावी नियोजन करून सोडल्या जातात. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे वर्ध्याकरांमध्ये पूर्वीच भीतीचे वातावरण आहे. हेच भीतीचे वातावरण निवळावे आणि कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून संपूर्ण बसेस निर्जंतूक करण्यात येत आहेत.बसस्थानकात गर्दी होऊ नये म्हणून फलाटावर प्रवासी असल्यास बसेस सोडल्या जात आहेत. तर प्रवासी नसल्यास बसफेरीच रद्द केली जात आहे. गुरूवारी राज्य परिवहन महामंडळाने कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन तब्बल ५० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या नाहीत, असे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वाहक, चालकांसाठी मुबलक ‘मास्क’कोरोनाची लागण रापमच्या वाहक व चालकांना होऊ नये म्हणून त्यांना मास्क दिले जात आहे. वरिष्ठांकडे मागणी केल्यानंतर रापमच्या कर्मचाºयांसाठी मुबलक प्रमाणात मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर प्रत्येक बस निर्जंतूक करण्यासाठी जिल्ह्यातील पाचही आगारात अतिरिक्त मनुष्यबळही लावण्यात आले आहे.नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता त्याबाबतची खबरदारी घेणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर विनाकारण प्रवास टाळवा तसेच बसस्थानकांवर गर्दी करू नये. रापमच्या कर्मचाºयांसाठी मुबलक प्रमाणात मास्क उपलब्ध झाले आहेत. शिवाय बसेस निर्जंतूक करण्यात येत आहेत.- चेतन हासबनीस, विभाय नियंत्रक, रापम, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी