शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

‘जलयुक्त’ अभियानानंतरही ‘शिवार’ तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कृषी विभाग, जिल्हा परिषदचा लघू सिंंचन विभाग, जलसंधारण विभाग, वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल विकास विकास यंत्रणा, वनविभाग, सद्भावना ग्रामीण विकास संस्था व यशोदा नदी या यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यात १९१ गावांमध्ये १ हजार ५८० कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. या सर्वच कामांसाठी ५८ कोटी ७४ लाख १२ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र, या कामांकरिता ४६ कोटी ७२ लाख २८ हजार रुपयांचाच कार्यारंभ आदेश दिला. 

ठळक मुद्देनाला खोलीकरण, बंधाऱ्यांची कामे सदोष : जलयुक्त अभियानातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती

  अमोल सोटे    लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याकरिता राज्य शासनाने जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना राबविली. या योजनेकरिता कोट्यधीचा निधीही खर्ची घालण्यात आला. पण,  पुढे पाठ मागे सपाट अशीच कामांची पद्धत राहिल्याने जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानानंतरही शेतशिवार तहानलेलेच  असल्याची स्थिती दिसून येत आहे.जिल्ह्यात कृषी विभाग, जिल्हा परिषदचा लघू सिंंचन विभाग, जलसंधारण विभाग, वरिष्ठ भुवैज्ञानिक भूजल विकास विकास यंत्रणा, वनविभाग, सद्भावना ग्रामीण विकास संस्था व यशोदा नदी या यंत्रणांच्या माध्यमातून जिल्ह्यात १९१ गावांमध्ये १ हजार ५८० कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. या सर्वच कामांसाठी ५८ कोटी ७४ लाख १२ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र, या कामांकरिता ४६ कोटी ७२ लाख २८ हजार रुपयांचाच कार्यारंभ आदेश दिला. १९० गावांतील १ हजार ५१३ कामे पूर्ण झाली असून ६५ कामे प्रगतीपथावर आहे. या सर्व कामांवर आतापर्यंत ३६ कोटी ५९ लाख ९१ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ही योजना राबवित असता आष्टी तालुक्यात पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, पांढुर्णा, किनी, मोई, चामला, बांबर्डा, बोरखेडी, कोल्हाकाळी, ठेकाकोला या गावात नाला खोलीकरण, सिमेट कॉक्रिटचे नालाबांध बांधण्यात आले. मात्र, अंदाजपत्राकानुसार बांधकाम  केले नसल्याने या सदोष बांधकामांमुळे  पाणी साठविण्याची व्यवस्था झाली नाही. पावसाळ्यातील पाणी सरळ वाहत गेल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना या नाला बांधकामाचा कोणताही फायदा झालेला नाहीत. नाला खोलीकरणातही हीच बोंब असल्याने नाल्याची खोली अत्यल्प ठेवल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच पाण्यात बहुतांश नाले बुजलेले आहेत.  शासनाने जलसमृद्धीकरिता ही महत्वाकांक्षी योजना रावबिली असून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेमध्येच नियोजनाचा अभाव असल्याने या योजनेची फलश्रुती दिसत नाही. त्यामुळे या योजनेप्रती सर्वत्र असंतोष पसरला  असल्याने शासनाकडून चैाकशी समिती स्थापन केली आहे. त्यात याही कामांची चैाकशी होण्याची शक्यता आहे.

बंधाऱ्याचे बांधकामात झाले निकृष्ष्ट जलयुक्त शिवार योजना रेड झोन, येलो झोन व डार्क झोन या तिन्ही झोनमध्ये राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वनविभाग व कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांचे बांधकाम केले. यात सिमेंट कॅांक्रिडऐवजी मुरुम, माती व मोठे दगड वापरण्यात आल्याने अल्पावधीत बंधारे फुटले. त्यामुळे पाण्याची साठवणूक झालेली नाहीत.

ग्रामसभेतील आराखडा दुर्लक्षितजलयुक्त शिवारा योजनेत शासनाने ग्रामस्तरावर नियोजन करण्यासाठी ग्रामसभा घेऊन आराखडा पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सोयीने आराखडे तयार करुन कामे आटोपली. यात लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केला होता. पण, त्यानंतर या योजनेच्या विरोधात कुणीही आवाज उठविला नाही, हे विशेष.

जलयुक्त शिवारमधून तालुक्यात अनेक कामे झालीत पण, या योजनेचा मुळ उद्देश कुठेच साधला गेला नाही. या कामांच्या नियोजनामध्येच अभाव असल्याने या योजनेला खिळ बसली आहे. याची चैाकशी केल्यास गैरप्रकार पुढे आल्याशिवाय राहणार नाही. - अनिल गंजीवाले, ममदापूर

जलयुक्त शिवार योजना शासनाने नियोजन करुन राबविली असती तर या योजनेची नक्कीच फलश्रुती झाली असती. मात्र थातुरमातूर कामे करुन या योजनेला अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केले. त्यामुळे केवळ योजना राबवायची आहे म्हणून कामे झाल्याचे दिसून येत आहे.  - गजानन भोरे, साहूर

जलयुक्त शिवार अभियानातून कोल्हाकाळी या गावात नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. पण, खोलीकरण केवळ नावालाच असल्याने या कामाचा गावकऱ्यांना कवडीचाही फायदा झालेला नाहीत. केवळ शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे. - उकंडराव आहाके, कोल्हाकाळी

जलयुक्त शिवार योजनेतून थार व चामला या दोन्ही गावात नाला खोलीकरण व बंधारे बांधण्यात आले. या कामात गुणवत्ता नसल्याने शासनाचा निधी व्यर्थ गेला आहे. वनिता केवटे, सरपंच, थार

जलयुक्त शिवार योजना ही अधिकाऱ्यांच्या लाभाकरिता तयार केलेली योजना असल्याचे चित्र अनुभवास आले. माझ्या काळात अनेक कामे झाली पण, त्याचा फायदा होतांना दिसत नाही. - सुधाकर पवार, सरपंच, मोई

जलयुक्त शिवारमधून गावात काम पोरगव्हाण या गावात कामे करण्यात आली. मात्र, ही कामे अंदाजपत्रकानुसार झालेली नसल्याने अल्पावधीतच कामाची वाट लागली आहे. बहुतांश कामे सदोष असून शासनाने झालेल्या कामांची तात्काळ चैाकशी करण्याची गरज आहे. - श्रीराम नेहरे, सरपंच, पोरगव्हाण

नाला खोलिकरणाचे काम पूर्णत्वास गेल्यावर त्यामध्ये पाण्याची साठवणूक होणे क्रमप्राप्त होते. अंदाजपत्रकानुसार कुठेही खोलिकरण करण्यात आले नसल्याने कुठेही पाणी साचले नाही. केवळ कमिशनच मुरविण्यात आले आहे. यामुळे योजनेची वाट लागली.- अंकित कावळे, उपसरपंच मणिकवाडा

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार