शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

लॉकडाऊनमुळे परसबाग उन्हाळ्यातही टवटवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

गेल्यावर्षी पाणी टंचाईची झळ शहराला बसल्याने फुलझाडांची आबाळ अनेकांनी पाहिली होती. यंदा मात्र हा प्रसंग ओढावला नाही. नागरिक लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून घरात बंदिस्त झालेत. त्यामुळे महिलांनी आपला वेळ घरातील बागेच्या संगोपनासाठी दिला. त्यामुळे उन्हाळ्यात यंदा घरा घरातील बगीचे टवटवीत दिसून येत आहे. फुलांचा बहर मनमोहक आहे.

ठळक मुद्देअनेक कुटुंबांकडून वेळेचा सदुपयोग : मुबलक पाणी, राखली उत्तम निगा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक फटका बसतो तो बंगल्यासमोरील गार्डन, घरातील बगीचे यांना. मात्र यंदा ती वेळ आली नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासूनच देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे घरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात कुठेही जाता आले नाही. त्यामुळे ज्यांच्या घरात बगीचे आहेत. त्या सर्वांनी यंदा बगीचाची चांगली निगा राखली. सुदैवाने मागील वर्षी जिल्ह्यात पाणी टंचाई वर्धा शहरात जाणवली होती ती यंदा जाणवली नाही.त्यामुळे फुलझाडांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात ४४ -४५ अंश सेल्सियसवर पारा गेला तरी घराच्या बगीच्यातील झाडे टवटवीत दिसून येत आहे. वर्धा शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहर परिसराला लागून असलेल्या नालवाडी, पिपरी, सावंगी, उमरी, मसाळा, सिंदी (मेघे) आदी भागात नोकरदार, शेतकरी तसेच मध्यवर्गीय लोकांनी प्लॉट घेऊन घरे बांधली आहेत. त्या नागरिकांनी घरात बगीचा सुध्दा तयार केले आहे. अशा १० ते १५ टक्के लोकांकडे बगीच्याची निगा राखण्यासाठी माळीकाम करणारे लोक सुध्दा ठेवलेले आहेत.दरवर्षी नागरिक उन्हाळ्यात मुलांच्या शाळांना सुट्टया लागल्यावर बाहेरगावी जात असत. काही लोक पर्यटनासाठी थंड हवेच्या ठिकाणी रवाना होत होते. अशा प्रसंगी घरातील बगीच्याची जबाबदारी माळी काम करणाऱ्या व्यक्ती किंवा शेजाऱ्यांवर सोडून दिली जायची त्यांनी किमान संध्याकाळी आपल्या बगीच्यातील झाडांना पाणी घालावे अशी अपेक्षा राहायची यात कुचराई झाल्यास बगीचा वाळून अनेक रोप मरून जात. गेल्यावर्षी पाणी टंचाईची झळ शहराला बसल्याने फुलझाडांची आबाळ अनेकांनी पाहिली होती. यंदा मात्र हा प्रसंग ओढावला नाही. नागरिक लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून घरात बंदिस्त झालेत. त्यामुळे महिलांनी आपला वेळ घरातील बागेच्या संगोपनासाठी दिला. त्यामुळे उन्हाळ्यात यंदा घरा घरातील बगीचे टवटवीत दिसून येत आहे. फुलांचा बहर मनमोहक आहे.टेरेस गार्डनही बहरलेलॉकडाऊनमुळे नागरिक बाहेरच पडले नाही. त्यामुळे यावेळेचा काय सदपयोग करायचा तर नागरिकांनी घरातील बगीच्यावर आपले लक्ष केंद्रीत केले. यांचा परिणाम असा झाला की काही नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर बगीचा नियोजनबध्द पध्दतीने फुलविला. काही नागरिकांना घराच्या परिसरात असलेल्या झाडांची निगा राखण्यावर भर दिला. त्यामुळे यावर्षी कडक उन्हाळ्यातही शहरात अनेक घरातील बगीचे फुललेले दिसत आहे. ज्यांच्या शेतातही फुलझाडे होती. त्यांनीही फुलांची चांगली निगा राखली. जेव्हा की, उन्हाळ्यात फुलांना लॉकडाऊनमुळे मागणीच नव्हती. तरीही फुलझाडे चांगले बहरले हे विशेष.

टॅग्स :Waterपाणी