शहरं
Join us  
Trending Stories
1
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
2
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
3
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
4
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
5
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
6
Top Marathi News LIVE: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक, १२ जणांचा मृत्यू, ३५ जखमी
7
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
8
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
9
ओट्स की पोहे... वेट लॉस आणि एनर्जीसाठी एकदम परफेक्ट आहे 'हा' नाश्ता; फायदे एकदा वाचाच
10
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
11
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
12
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
13
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
14
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
15
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
16
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
17
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
18
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
20
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोडीमुळे वनसंपदा धोक्यात

By admin | Updated: April 8, 2016 02:00 IST

वनसंपदा वाढावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे;

वनविभागाचे दुर्लक्ष : पर्यावरणाचा ऱ्हास
आर्वी : वनसंपदा वाढावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे; पण अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यात शासन, प्रशासन अपयशी ठरत आहे. यामुळे खर्च व्यर्थ जात असून अवैध वृक्षतोडीमुळे वनसंपदाच धोक्यात आल्याचे आर्वी वन परिक्षेत्रात दिसून येत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
आर्वी वनपरिक्षेत्रात अधिकाधिक बिटमध्ये अवैध सागवान तोडीला उधान आले आहे. सागवानसह अन्य प्रजातीच्या वृक्षांचीही सर्रास कत्तल केली जात आहे. अवैध तोडीचा माल जप्त करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी वृक्षतोड सर्रास सुरूच आहे. काही गावात दोन वर्षांपूर्वी वनसंरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे; पण या समित्या अवैध वृक्षतोडीला लगाम लावण्यासाठी कुठलाही प्रयत्न करीत नसल्याचे दिसते. अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी वनविभागाने कुठलेही प्रयत्न केले नाही. इंदरमारी, माळेगाव, खानवाडी आदी जंगलात काही दिवसांपासून तेंदुपत्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मोठ्या वृक्षांसह वनौषधीही जळून नष्ट झाली आहे. तळेगाव (श्या.पं.) व अन्य गावांत शिकाऱ्यांकडून ससे, निलगाय, हरीण व मोरांची शिकार केली जात असल्याचे सांगण्यात येते; पण वन विभागातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा उपवनसंरक्षकांनी याकडे लक्ष देत अवैध वृक्षतोड व शिकारीवर आळा घालावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)