शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

सुरक्षित निवारा देता का, निवारा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 6:00 AM

आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या सिमेवर कुऱ्हा धरण आहे. सध्या ते १०० टक्के भरले असून मागील आठवड्यात याच धरणाच्या भिंतीला तडा गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी या धरणाची पाहणी केली होती.

ठळक मुद्देबाऱ्हा सोनेगाववासीयांचा सवाल : धरणफुटीच्या भीतीने घर सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसभर शेतात राबून थकलेले बाऱ्हा सोनेगाव येथील नागरिकांनासह चिमुकल्यांना सध्या रात्र शेतात पाल टोकून तयार केलेल्या झोपडीत काढावी लागत आहे. बाऱ्हा सोनेगाव नजीकच्या कुऱ्हा धरणाच्या भिंतीला तडा गेल्याने सध्या या गावातील नागरिकांच्या मनात धरणफुटीबाबत कमालीची भीती आहे. सदर ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाकडून अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांकडून सध्या ‘सुरक्षीत निवारा देता का हो निवारा’ अशी मागणी होत आहे.आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या सिमेवर कुऱ्हा धरण आहे. सध्या ते १०० टक्के भरले असून मागील आठवड्यात याच धरणाच्या भिंतीला तडा गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी या धरणाची पाहणी केली होती. शिवाय तेथील नागरिकांशी संवादही साधला होता. इतकेच नव्हे तर महसूल विभागाने दक्षता म्हणून याच गावातील ४७ कुटुंबातील एकूण १४७ जणांना रसुलाबाद येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात हलविले होते. तर यापूर्वीही बाऱ्हा सोनेगाव येथील ग्रामस्थांना पुराच्या धोक्यामुळे अनेकदा सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले होते. वारंवार पुराचा धोका राहत असल्याने बाऱ्हा सोनेगाव या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येते. तर सध्या या गावातील नागरिकांना धरणफुटीच्या भीतीमुळे मोठा धोका पत्कारून शेतात पाल टोकून त्याच झोपडीत रात्र काढावी लागत आहे.सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकाबाºहा सोनेगाव येथील नागरिक सध्या धरणफुटीच्या भीतीमुळे शेतातील झोपड्यांमध्ये कंदीलांच्या सहाय्याने रात्र काढत आहेत. इतकेच नव्हे तर ज्या परिसरात ते रात्र काढत आहेत. त्या परिसरातील सरपटणाºया प्राण्यांचा वावर असून हा धोका सध्या पत्कारत आहेत.विद्यार्थ्यांना शैक्षणिक फटकाबाºहा सोनेगाव येथील शाळकरी मुल-मुली रसुलाबाद व वर्धा येथे शिक्षणासाठी येतात. इतकेच नव्हे तर शाळा व महाविद्यालयात शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर ते गावाची वाट धरतात. परंतु, सध्या त्यांना काळोखातच रात्र काढावी लागत असल्याने त्यांचा गृहपाठ पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

टॅग्स :Damधरण