शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मध्यरात्री थरार! धारदार शस्त्राने सपासप वार करून दारूविक्रेत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 3:13 PM

जुन्या वादातून दारूविक्रेत्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० च्या सुमारास गोंडप्लॉट परिसरात घडली.

ठळक मुद्देजुना वाद गेला विकोपाला १५ वार अन् कोथळाच काढला बाहेरगोंडप्लॉट परिसरातील घटना

वर्धा : जुन्या वैमनस्यातून दारूविक्रेत्याची धारदार शस्त्राने सपासप वार करत  निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री ११.३० वाजताच्या सुमारास शहरातील गोंडप्लॉट परिसरात घडली. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी शहर पोलिसांनी एकास अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. मनोज मुकुंद धानोरकर (३२) रा. केळकरवाडी असे मृत दारूविक्रेत्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृत मनोज धानोरकर याने घराच्या अवघ्या काही अंतरावर किरायाने खोली घेतली होती. त्या खाेलीतून तो दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला भ्रमणध्वनी करून जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशीतरी वाद सुरू असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला असल्याचे दिसून आले.

याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी मनोजची पत्नी कोमल धानोरकर रा. केळकरवाडी हिने शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी आकाश जयस्वाल याला अटक करून उर्वरित पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी भेट दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, नरेंद्र कांबळे, संजय पंचभाई यांच्यासह शोध पथकाने तपासकार्य सुरू केले. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

मृतक आरोपी दोघेही दारूविक्रेते

मृत मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मृतक मनोजने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आकाश जयस्वाल याने मनोजचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृतकावर विविध गंभीर गुन्हे दाखल

मृत मनोज धानोरकर हा गुंडगिरी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर शहर ठाण्यात जीवे मारण्याचा हल्ला, जबर मारहाण आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. तो किरायाने घेतलेल्या खोलीतून दारूविक्री करायचा. त्याच खोलीत शनिवारी मध्यरात्री त्याचा सहा जणांनी ‘गेम’ केला. आरोपी आकाश जयस्वाल हा देखील दारूविक्रेता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१५ वार अन् कोथळाच काढला बाहेर

मृतक मनोज हा मध्यरात्रीच्या सुमारास दारूअड्ड्यावर असतानाच आरोपी आकाश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांनी मनोजवर हल्ला चढविला. मनोजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या हनुवटी, मान, पाठ, आदी ठिकाणी सुमारे १५ ते २० वेळा सपासप वार करून मनोजचा कोथळाच बाहेर काढला. हा थरार नागरिकांनी डोळ्याने अनुभवला असून या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू