शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

अस्ताव्यस्त वाहतुकीने शहराचा कोंडमारा

By admin | Updated: December 18, 2014 02:03 IST

जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणघाट शहराला सध्या अस्ताव्यस्ततेचे स्वरूप आले आहे.

वर्धा : जिल्ह्यातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या हिंगणघाट शहराला सध्या अस्ताव्यस्ततेचे स्वरूप आले आहे. लोकसंख्या वाढत असल्याने अस्ताव्यस्त वाहतुकीने शहरातील वाहतुकीचा कोंडमारा होत आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण व्यवस्था पांढरा हत्ती ठरत असल्याचा आरोप शहरातील जनसमस्या निवारण कृती समितीने केला असून व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. शरात प्रवेश करणारा हिंगणघाट-नागपूर मुख्यमार्ग हा सा.बां. विभागांंतर्गत येतो. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ही पोलीस विभागाची आहे. परंतु शहरातील वाहतुक नियंत्रण व्यवस्था पूर्णत: ढेपाळली असून रहदारी मार्गावरील अतिक्रमण, अस्ताव्यस्त वाहतूक, अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे अडथळे निर्माण होऊन अपघातांची मालिकाच सुरू झाली आहे. शहरातील नागपूर मार्गावर हरिओम सभागृह, कापसे इंजि. वर्कशॉप व लक्ष्मी मंगल कार्यालय असून लग्न समारंभाकरिता येणाऱ्यामुळे आणि सभागृहांनी केलेल्या अतिक्रमणामुळे संपूर्ण मार्ग अडविल्या जातो. मागील चार-पाच वर्षापासून सतत हा प्रकार सुरू असल्यामळे अपघात वाढल्याचा आरोप समितीने केला आहे. शहरातील नाल्या, गटारे आदींची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी काविळ, डेंग्यू अशा आजाराची लागण होत आहे. यावर स्वास्थ्य विभाग ठोस कारवाई करीत नसल्याने आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात बेवारस मोकाट जनावरे व कुत्रे यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शहरातील मुख्य रोड तसेच अन्य भागात रोडवर फिरणे, बसणे, घाण करणे यामुळे वातावरण दूषित होण्यास वाव मिळत आहे. जनावरे रोडवर बसून राहात असल्याने रहदारीस पूर्णत: अडथळा निर्माण होत असून सतत अपघात होणे ही बाब आता नित्याची झाली आहे. यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले असून नगर परिषद जाणीवपूर्ण दुर्लक्ष करून जनतेच्या जीविताशी खेळी करीत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.या समस्यांबाबत निवेदने व सूचना करूनही संबंधित अधिकारी कोणतीही कार्यवाही करीत नाही. त्यामुळे नागरिकांमधील असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे. याकरिता उपरोक्त समस्यांची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी जनसमस्या निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. तसेच निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्ह्याचे खासदार, क्षेत्राचे आमदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना सादर केल्या आहे. औद्योगिकदृष्ट्या हिंगणघाट हा महत्त्वपूर्ण तालुका आहे. शहरातील अवजड वाहनांची वर्दळ सतत वाढत आहे. असे असतानाही वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने शहराचा कोंडमारा होत आहे.(शहर प्रतिनिधी)