शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमातील उपक्रम देतात बापूंच्या कार्याची साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होता. सेवाग्राम आश्रमात असताना चरखा आणि ग्रामोद्योगाला चालणा देण्याचे काम सुरू केले. जे आजही सुरू आहे.

ठळक मुद्देदिनविशेष : अनेक जण होणार नतमस्तक

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महत्मा गांधी यांनी येथील आश्रमातूनच स्वातंत्र्य चळवलीला दिशा देण्याचे काम केले. २ आॅक्टोबरचे औचित्य साधून येथे अनेकजण नतमस्तक होणार असून आजही आश्रमातील विविध उपक्रम बाजूंच्या कार्याची साक्ष देत असल्याचे बघावयास मिळते.महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होता. सेवाग्राम आश्रमात असताना चरखा आणि ग्रामोद्योगाला चालणा देण्याचे काम सुरू केले. जे आजही सुरू आहे. बापूंचा आश्रम नियम, कार्य, उद्योग आदी तत्व व मूल्यांवर आधारीत होता. जो आजही कायम असल्याने इथे येणाऱ्यांना नवी उर्जाच मिळते. शिवाय येथील सुरू असलेले उपक्रम बापूंच्या कार्य व विचारांची साक्ष देतात. गांधीजींनी आपल्या आयुष्यातील साठ वर्षे सार्वजनिक व समाज कार्यासाठी वेचले.यामुळे बापूंचे विचार व कार्य लोकांसाठी आदर्श व मार्गदर्शक राहिले आहे. स्वातंत्र्य चळवळीसाठी सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि रचनात्मक कार्य महत्वाचे ठरून बहुसंख्येने युवक आकर्षिल्या गेल्या. याच मूल्यातून व कार्यातून देशसेवेचा नवा आदर्श आपल्या प्रत्यक्ष जीवन कार्यातून समाजापुढे ठेवला. आजच्या आधुनिक काळात वाढत्या औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानच्या युगातही बापूंच्या जीवन कार्याचे आणि रचनात्मक कार्याची गरज प्रकर्षाने जानवत आहे हे सत्य नाकारता येत नाही. २ आॅक्टोबरला गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार व त्यांच्या कार्याचे स्मरण जगभरात होणार आहे.१९३६ मध्ये आश्रमाची स्थापना१९३६ मध्ये सेवाग्रामला आश्रमची स्थापना केली. आपण खेड्यातील जीवन अनुभवायला आणि ग्रामीणोत्थानासाठी आलो आहे असे त्यांनी सांगितले. त्या काळी सेवाग्राम खेड्याचे उत्तम उदाहरण होते. त्यामुळेच गांधीजींनी आपली पसंती दर्शवून राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.अन् घडला इतिहासआश्रमातील जीवन सामुदायिक होते. पहाटे ते रात्रीपर्यंतचे दैनंदिन कार्यक्रम ते पण नियम व शिस्तीत होतात. येथूनच शिक्षण, उद्योग, सूतकताई ते कापड, स्वावलंबन आणि मूल्यांवरील जीवन पद्धतीचे शिक्षण दिल्याने देशातील विविध भागात कार्यकर्ते जाऊन काम करू लागले. यातूनच रोजगार, विचार आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी बळ मिळायला लागले; पण यासाठी सर्व प्रथम आश्रमातच शेती, गोशाळा, रचनात्मक कार्य, एकादश व्रते, देशनिष्ठा आणि सामुदायिक जीवन पद्धतीचे ज्ञान देण्यात आल्याने अन्य भागात कार्य करण्यासाठी सोईस्कर झाले. यातूनच पुढे स्वातंत्र्याचा इतिहास घडला.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम