शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

४० कुटुंब टिनपत्र्याच्या शेडमध्ये

By admin | Updated: April 26, 2016 01:48 IST

तळपते उन्ह.. रात्रीला वीज नाही.. घर गाठण्याकरिता रस्ता नाही.. पिण्याकरिता पाणी नाही.. घराच्या नावावर आठ बाय

 आर्वी : तळपते उन्ह.. रात्रीला वीज नाही.. घर गाठण्याकरिता रस्ता नाही.. पिण्याकरिता पाणी नाही.. घराच्या नावावर आठ बाय आठचा टिनाचाच ठेला.. या स्थितीत जीवन जगण्याची वेळ नेरी पुनर्वसन येथील ४० कुटुंबियांवर आली आहे. गत आठ वर्षांपासून या वेदना सहन करीत त्यांना जीवन जगावे लागत आहे. शासनाच्या योजनेत इतरांचे भले करण्याची ही शिक्षाच आम्हाला भेटत असल्याच्या प्रतिक्रीया त्यांच्या तोंडून व्यक्त होत आहे. कुठलेही पुनर्वसन करताना तेथील नागरिकांना सर्वच नागरी सुविधा देण्याचा शासनाचा दंडक आहे. असे असताना निम्न वर्धा धरणात जमिनी व घर गेलेल्यांचे पुनर्वसन करताना त्यांना कुठल्याही नागरी सुविधा देण्यात आल्या नसल्याचे दिसून आले आहे. सुविधा मिळाविण्याकरिता येथील नागरिकांनी शासनदरबारी लढा दिला; मात्र त्यांच्याकडून यावर कुठलाही मार्ग निघाला नाही. घर म्हणून आठ बाय आठचा टिनाचा ठेला. यात ४४ अंशावर पोहोचलेला उन्हाचा पारा. या सर्व परिस्थितीत येथील कुटुंब कसे राहत असेल याचा विचारही थरकाप उडवितो. या गावात पाय ठेवताच येथील भीषणता सर्वच सांगून जाते. आमचे घर प्रकल्पात गेले, शासनाने जे काही पैसे दिले त्यात घर झाले नाही. शिवाय कुटुंबाचे आजारपण यात पैसा हातचा निघून गेला. सध्या टिनाच्या शेडमध्ये अंधारात जगत आहोत. शासनाच्या योजनेत घर दिले त्याचेच फळ भोगत आहोत.- भास्कर सहारेआमच्याकडे काही शेती नाही. जुन्या गावात आमचं स्वत:चं घर होतं, परंतु जागा धरणात गेल्याने आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.- नर्मदा मुंदरेआम्हाला राहायला पक्के घर नसल्याने आठ वर्षांपासून टिनाच्या शेडमध्ये अंधारात राहतो. आमची साधी दखलही संबंधित विभाग घेत नाही.- रमेश कोहरेइथं राहायला आलो तेव्हापासून अंधारात राहतो. रात्री अपरात्री बाहेर निघता येत नाही. पावसाळ्यात तर घरात पावसाचे पाणी साचते तर उन्हाळ्यात टिनाचे चटके सोसावे लागतात.- कुसुम कामडीपुनर्वसन झाल्यापासून नेरी गावात समस्या वाढत आहे. शासनाने पुनर्वसन तर केले मात्र सोईसुविधा दिल्या नाही. सोईसुविधेच्या नावावर समस्याच वाढल्या.-बाळा सोनटक्केग्रामपंचायत सदस्य, नेरी पुनर्वसन ता. आर्वी