शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

१८,६०० झाडे होरपळली

By admin | Updated: May 1, 2017 00:29 IST

तालुक्यात सामाजिक वनीकरणने १८ हजार ६०० रोपटी लावली. शासनाच्या बिहार पॅटर्ननुसार त्यांचे संगोपन केले.

ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : सामाजिक वनीकरणच्या प्रयत्नांवर पाणी प्रफुल्ल लुंगे   सेलू तालुक्यात सामाजिक वनीकरणने १८ हजार ६०० रोपटी लावली. शासनाच्या बिहार पॅटर्ननुसार त्यांचे संगोपन केले. नियमानुसार तीन वर्षांनंतर जोपासलेली झाडे ग्रामपंचायतीच्या हवाली केली. ग्रामपंचायतींनी ती झाडे हस्तांतरीत केली; मात्र ती कागदावरच असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने धुरे पेटविण्याच्या प्रकारात ही झाडे होरपळत असल्याचे समोर आले. सामाजिक वनीकरण विभागाने सेलू तालुक्यातील जवळपास १८ रस्त्यांच्या दुतर्फा १८ हजार ६०० झाडे लावली. यापैकी सन २०१२ च्या पावसाळ्यात १० हजार, २०१३ मध्ये ४ हजार व २०१४ ला ४ हजार ६०० रोपे लावली. तत्कालीन लागवड अधिकारी विकास गभणे यांनी वनरक्षक आर.टी. बहादुरे, सहायक लागवड अधिकारी आर.जे. फुले, सहकारी एन.एस. निखाते यांच्या मदतीने झाडांचे संगोपन केले. बिहार पॅटर्ननुसार २०० झाडांमागे एक व्यक्ती या प्रमाणे कामगार ठेवले होते. संगोपनानंतर केले ग्रा.पं.कडे हस्तांतरीत सेलू : रस्त्याच्या दुतर्फा लावलेली ही झाडे रस्ता ज्या ग्रामपंचायत हद्दीत येतो त्या ग्रामपंचायतीला शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१७ ला हस्तांतरित केले. यावेळी ग्रामसेवक व सरपंच यांना या झाडांची निगा राखण्याचे आदेश देण्यात आले. पण, ग्रामपंचायतींचे याकडे दुर्लक्ष झाले. शेताचे धुरे पेटवितांना ही झाडे भस्मसात झाली. तालुक्यातील वडगाव(जंगली) ते हिंगणी, शिवणगाव, कोटंबा ते धपकी व सेलू ते सुकळी(स्टे.) या रस्त्याची झाडे बघितली असता वाढलेली झाडे जाळल्या गेल्याचे दिसून आले. इतरही रस्त्याचे हाल कमी जास्त प्रमाणात असेच असण्याची भीती व्यक्त होत आहे. सन २०१४ पर्यंत लावलेली १८ हजार ६०० झाडे ग्रामपंचपायतींना हस्तांतरीत झाली आहे. २०१५ ला सामाजिक वनीकरण ने ७ हजार २००, २०१६ ला ५ हजार ६०० व झाडे लावून त्याचे संगोपन केले. येत्या पावसाळ्यात २ हजार ८०० झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. या झाडांचे संगोपन व देखभाल वनीकरणच करीत आहे. नव्याने आलेले लागवड अधिकारी आर. एस. दवंडे हेही तेवढ्याच जिद्दीने काम करताना पाहून अधिनस्त कर्मचारीही तन्मयतेनेच काम करताना दिसतात. आता ही वाढलेली झाडे ग्रामपंचायतीला द्यावी अथवा नाही, असा विचार होत आहे. तक्रार होताच कारवाई वर्धा : आकाशने वर्धेला परत आल्यावर वर्धा लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी शोधमोहीम राबविली. सदर मोहिमेदरम्यान एक तरुण वर्धा रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारणा केली असता प्रारंभी त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसी हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला ८ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, हवालदार किशोर दाभाडे, दिलीप बारंगे, अशोक हनवते, राहूल येवले, नितीन शेंडे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)