मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:22 IST2025-09-28T14:22:24+5:302025-09-28T14:22:51+5:30

विद्यालयातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ४५६ विद्यार्थिनींना दररोज पौष्टिक भोजन मिळणार आहे.

Mission Shakti: Free mid-day meal for girl students of 9th to 12th, a unique step under the guidance of Yogi | मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

कानपूरच्या सरकारी बालिका इंटर कॉलेज चुन्नीगंजमध्ये मिशन शक्ती अंतर्गत प्रथमच इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्याचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली, इयत्ता ९ वी ते १२ वी साठी हा उपक्रम सुरू करणारे GGIC चुन्नीगंज हे राज्यातील पहिलं विद्यालय बनलं आहे.

या उपक्रमामुळे आता विद्यालयातील इयत्ता ९ वी ते १२ वीच्या ४५६ विद्यार्थिनींना दररोज पौष्टिक भोजन मिळणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी स्वतः विद्यार्थिनींसोबत बसून भोजन केलं आणि या नवीन उपक्रमाची सुरुवात केली. यापूर्वी राज्य शासनाची योजना केवळ इयत्ता ६ वी ते ८ वीपर्यंत मर्यादित होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने इस्कॉन कानपूर आणि अचिन्त्य फाउंडेशन यांनी उच्च वर्गाच्या विद्यार्थिनींनाही रोज भोजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.

भोजन मिळाल्याने उपस्थिती वाढण्याची आशा 

विद्यालयाच्या प्रिन्सिपल मंगलम गुप्ता यांनी सांगितलं की, संस्थेमध्ये एकूण ७०५ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. इयत्ता ६ वी ते ८ वी च्या २४९ विद्यार्थिनींना 'अक्षयपात्र फाउंडेशन' मार्फत आधीच भोजन मिळत असल्यामुळे त्यांची उपस्थिती ८० टक्क्यांहून अधिक आहे, तर इयत्ता ९ वी ते १२ वी च्या ४५६ विद्यार्थिनींची उपस्थिती सुमारे ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली होती. भोजन मिळाल्याने मोठ्या वर्गांमध्येही उपस्थिती वाढण्याची आशा आहे.

"इस्कॉन दररोज शाळेत मोफत जेवण पुरवेल”

इस्कॉनचे प्रभु अमृतेश कृष्ण दास म्हणाले, "आपल्या समाजाला उपासमारीपासून मुक्त करण्यासाठी स्थानिक उपक्रमांमध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहोत. आमची योजना पूर्ण झाली आहे आणि आमच्याकडे दररोज ५,००० लोकांना जेवण देण्याची क्षमता आहे." त्यांनी पुढे सांगितले की, इस्कॉन दररोज शाळेत मोफत जेवण पुरवेल.

२० लाख रुपयांचा खर्च

समाजसेवक आणि अचिन्त्य फाउंडेशनचे संचालक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितलं की, या योजनेवर प्रतिवर्ष सुमारे २० लाख रुपयांचा खर्च येईल, जो इस्कॉन, अचिन्त्य फाउंडेशन आणि अन्य समाजसेवकांच्या सहकार्याने पूर्ण केला जाईल.

आरोग्यावर आणि शिक्षणावर सकारात्मक परिणाम

जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'मिशन शक्ती'च्या दृष्टिकोनुसार शिक्षण आणि पोषणाला जोडण्याचा प्रयत्न आहे. डीएम यांनी सांगितले की, यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर सकारात्मक परिणाम होईल. यासोबतच, जिल्हाधिकाऱ्यांनी जनसहयोगातून इयत्ता ९ वी ते १२ वी च्या ४५६ विद्यार्थिनींना शालेय गणवेश आणि बूट देखील उपलब्ध करून दिले आहेत.

इस्कॉनने विद्यार्थिनींसाठी तयार केलेला मध्यान्ह भोजनाचा मेन्यू पौष्टिकतेसोबत चवीचा समतोल राखणारा आहे:

सोमवार – कढी पकोडा, बटाटा-पडवळ, भात, चपाती
मंगळवार – भात, मूग डाळ, चपाती, सोयाबीन बटाटा
बुधवार – भात, तूर डाळ, चपाती, चणा बटाटा
गुरुवार – भात, मूग डाळ, चपाती, बटाटा भोपळा
शुक्रवार – भात, चपाती, छोले, हलवा
शनिवार – भात, राजमा, मिक्स भाजी, चपाती

ही विविधता केवळ मुलींना आकर्षित करेल असे नाही, तर त्यांचा पोषण स्तरही सुधारेल.

Web Title : कानपुर: 9-12 कक्षा की छात्राओं के लिए मुफ्त मध्याह्न भोजन

Web Summary : योगी आदित्यनाथ के मार्गदर्शन में कानपुर के एक स्कूल में 9वीं से 12वीं कक्षा की छात्राओं को मुफ्त मध्याह्न भोजन मिलेगा। GGIC चुन्नीगंज ऐसा करने वाला पहला स्कूल है, जिसमें इस्कॉन और अचिन्त्य फाउंडेशन का सहयोग है। इससे पोषण और उपस्थिति में सुधार होगा।

Web Title : Free midday meals for girls in grades 9-12 in Kanpur.

Web Summary : Kanpur school girls in grades 9-12 now get free midday meals, thanks to an initiative under Yogi Adityanath's guidance. GGIC Chuniganj is the first in the state to offer this. ISKCON and Achintya Foundation support this, improving nutrition and school attendance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.