वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
राज्यातील सर्व जागा लढविण्याची घोषणा करणाऱ्या वंचित आघाडीने नाशिकमधील एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. ज्यांची नावे इच्छुक म्हणून पुढे येत आहेत त्यांना पक्षाकडून अद्यापही शब्द देण्यात आला नसल्यामुळे वंचितच्या गोटात सध्यातरी शांतता जाणवत आहे ...
देशात दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात पाच वर्षात सहा कोटींहून अधिक कामगार बेरोजगार झाले सत्ताधारी आपरे अपयश झाकण्यासाठी देशात दंगली घडविण्याचे राजकारण करीत असल् ...