वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
लोकसभेला आंबेडकरांनी आघाडीसोबत जाणे टाळल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सहा ते सात जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. तर वंचितला एक जागा मिळाली. आता वंचित बहुजन आघाडी विधानसभेला पुन्हा एकदा जोर लावण्यासाठी सज्ज झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत वंचितने आघाडीकडे महाराष्ट्रातील ४८ पैकी २४ जागांची मागणी केली होती. ही मागणी नक्कीच स्वीकार्ह नव्हती. त्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. वंचितने तीच भूमिका विधानसभा निवडणुकीतही घेतल्याचे दिसून येते. ...
लोकसभा निवडणुकीत जागावाटपच्या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाआघाडीत सामील झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. ...
गेल्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाच पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपला यश मिळाले होते. मात्र बाळापुर मतदारसंघात मोदी लाटेतही भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. ...