केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmers Protest Delhi: दिल्लीच्या सीमा होणार मोकळ्या; शेतकऱ्यांची घरवापसी उद्यापासून, शेतकरी आंदाेलनातील सर्वात माेठे नेते राकेश टिकैत आणि त्यांचे बंधून नरेश टिकैत तसेच युद्धवीर सिंह यांच्यासारखे नेते राष्ट्रीय लाेक दलाच्या जवळचे मानले जातात ...
शेतकरी संघटनांकडून जारी करण्यात आलेल्या जमाखर्चानुसार, आतापर्यंत आंदोलक शेतकऱ्यांच्या औषध-उपचारासाठी ६८ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे ...