देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. जय श्रीराम... एकच नारा.. एकच राम... या जयघोषणा अयोध्या नगरीत दुमदुमल्याचा दिसून येत आहे. ...
Loksabha Election 2024: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र विरोधी पक्षांच्या या आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पार्टीच्या प्र ...