देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विरोधी पक्षाला निवडणुकांमध्ये सलग होत असलेले पराभव पचविता येत नाहीत. माझ्याविषयी तीव्र द्वेष बाळगूनही काँग्रेस कधीही माझी कबर खोदू शकणार नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत केला. ...
Rahul Gandhi PM Modi: पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणारे भाषण लोकसभेत होऊ शकले नाही. पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत उत्तर देताना काँग्रेस हल्ला चढवला. ...