देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले. ...
इंदापूरच्या जागे संदर्भात अद्याप कोणत्याही स्वरुपाचा निर्णय झालेला नाही. तरीही पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांवर केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहे.... ...
महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे आजचे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये लाठ्या-काठ्या फिरवित होते, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसैन दलवाई यांनी लगावला आहे. ...
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे ...
कोण कुठेही गेले, तरी त्याची फारशी चिंता करण्याचे काम नाही. सामान्य जनता अजूनही आपल्यासोबत आहे; त्यामुळे जिल्ह्यातील १0 जागांवर ताकदीने लढत देण्याचा निर्धार बुधवारी येथे झालेल्या दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी व्यक्त केला. ...
लोकसभेला नाही, किमान विधानसभेला तरी बारामती जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीतून निवडणूक लढविल्यास नवल वाटायला नको. ...
हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत स्वत: कोणतेही वक्तव्य केलेले नाही. कार्यकर्त्यांकडूनच त्यांनी ‘भाजप’ असे वदवून घेतले. ...