देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
भालके आणि परिचारक यांना आव्हान देण्यास तोडीस उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास ही जागा मनसेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही मनसेची सुरू आहे. ...
परतूर आणि मंठा तालुक्यात कॅबिनेट मंत्री असतानाही पाहिजे, तसा विकास झालेले नाही. आजही पाणी, रस्ते, आरोग्य यांचा अनुशेष कायम आहे, त्यामुळे जनतेने आता युती सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी केले. ...
इंदापूरच्या जागे संदर्भात अद्याप कोणत्याही स्वरुपाचा निर्णय झालेला नाही. तरीही पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांवर केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आहे.... ...