देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने शनिवारी केली आहे. ...
काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष बदल झाला आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू देण्यात आला असून, त्यांच्याजागी खेडच्या अॅड. विजय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. ...
मुळचे तामिळनाडूमधील असलेले सेंथील २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, दक्षिण कन्नडमधील लोक आणि लोकप्रतिनिधी माझ्या बाबतीत उदार आहेत. मात्र मला सोपविलेले काम मी अर्ध्यात सोडून देत आहे. त्यामुळे मी येथील लोकांची माफी मा ...
सर्व गड किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थान आहे. शासनाने गड-किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ...