देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विधानसभेच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्ष तयार असून आर्थिक मंदी, बेरोजगारीसह शेतक-यांचे प्रश्न घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत. राज्यातील अनेक नेते कॉँग्रेसच्या संपर्कात असून अनेक जण पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच पहिली यादी जाहीर करणार आहे, असे कॉँग्र ...
महाराष्ट्राची ‘सुभेदारी’ परत मिळविण्यासाठी देवेंद्र फडणवीस निकराचे प्रयत्न करीत आहेत; तर शिवसेनाही या ‘सुभेदारी’साठी आसुसली आहे. तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मावळ्यांनाही सुभेदारीची स्वप्नं पडू लागली आहेत. ...