देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कॉंग्रेसने नेहमीच लोकशाही प्रक्रियेला सशक्त केलेे. कितीही राजकीय संकटे आली, सत्ता आली व गेली मात्र लोकशाही बळकट करण्याला व लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले. ...
राज्यात पुतण्यासाठी मतदारसंघ सोडणारे नेते असतानाच काका-पुतण्यांच्या लढती रंगत आहेत. बीड मतदारसंघातही जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे काका आमने-सामने आहेत. त्याचप्रमाणे निलंग्यात लढत होत आहे. ...
मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत भाष्य करताना कमलनाथ सरकारमधील जनसंपर्क मंत्री पी सी शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ...