देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
कऱ्हाड: दोन दिवसांपूर्वी कराडात राजकीय पक्षप्रवेशाचा एक जंगी कार्यक्रम झाला. काँग्रेसची सुमारे ५० वर्षाची परंपरा असणाऱ्या 'उंडाळकर' परिवारातील अँड. ... ...
Vishal Patil Chandrakant Patil: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना पुन्हा भाजपकडून ऑफर देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांनी सांगली दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल विधान केले आहे. ...
ईडीने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेसच्या नेत्यांची नावे चार्जशीटमध्ये नमूद केली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अमित मोरे यांच्या नेतृत्वात शिवाजी पुतळा चौकात भाजयुमोचे कार्यकर्ते एकत्रित आले. कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसविरोधात जोरदार घो ...