देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress demands Resign Of Manikrao Kokate and Dhananjay Munde: माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बहुजन समाज पार्टी आणि मायावतींसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मायावती आमच्या सोबत असत्या तर भाजपा कधीच जिंकू शकला नसता, असं राहुल गांधी म्हणाले. ...
काँग्रेसचे विदेश विभागाचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानावरून भाजपने काँग्रेस पक्षाला घेरले. त्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली. ...
काँग्रेसच्या नवीन मुख्यालयात पक्ष सरचिटणीस व प्रदेश प्रभारींच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा हवाला देऊन म्हटले आहे की, देशाच्या राजधानीत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आले पाहिजे. ...