श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भ्रष्टाचाराची इतकी नफरत असेल तर त्या भ्रष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाशी महायुती कशी करण्यात आली? अजित पवार यांना उपमुख्यमंत्री कसे करण्यात आले? संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या नेत्यांची पुढे चौकशी होणारच नाही का? याचे उत्तर द्यायची गरज नाही. ...
Maharashtra Government: एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या आणि भाजपामधील अनेक इच्छुकांना अद्यापही मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. मात्र आता ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे असून, येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ...