श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Madhya Pradesh News: भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशमधील नगरविकास आणि आवास राज्यमंत्री प्रतिमा बागरी यांचं कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. पोलिसांनी प्रतिमा बागरी यांच्या भाओजींना गांजाच्या तस्करी प्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. ...
आम्ही पहिल्यापासून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने काम करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायम वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं. ...
Mahayuti 2029 elections: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही असे विधान केले होते. त्यावरून भाजप २०२९मध्ये स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ...
माझी बदनामी करण्यासाठी असे कृत्य केले हे त्यांना कुणी सुपारी दिली हे सांगावे. त्या पैशाच्या गड्ड्यांसमोर जर मी दिसलो तर आमदारकीचा राजीनामा देईन असं आव्हान दळवी यांनी दिले आहे. ...
देशाच्या फाळणीनंतर, भारतात जे मुस्लीम थांबले, त्यांपैकी 80 टक्के मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्या मनात आजही 'वंदे मातरम'साठी आदर आहे. काँग्रेसला प्रत्येक विषयाला विरोध करण्याचा अधिकर कुणीही दिलेला नाही. असेही ते म्हणाले. ...
"पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले..." ...