अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रांतातील (आताचा मध्य प्रदेश) ग्वाल्हेर येथे झाला. १९३९ या वर्षी त्यांनी रा. स्व. संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. १९८० साली त्यांनी लालकृष्ण अडवाणी, भैरोसिंह शेखावत व इतर सहका-यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. पक्षाचे ते पहिले अध्यक्षही झाले. १९९६ साली त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाले, मात्र ते सरकार केवळ १३ दिवस टिकले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान झाले आणि त्यांचे सरकार १३ महिने चालले. १९९९ साली त्यांनी रालोआ या आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले व हे सरकार २००४ पर्यंत चालले. Read More
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात झालेल्या लोकसभेच्या सर्वच निवडणुकांत कोणता ना कोणता मुद्दा प्रभावी राहिला. अर्थात, त्याला पार्श्वभूमी ठरली ती दोन निवडणुकांमधील सरकारच्या कामगिरीची. मात्र, निवडणुकांत मुद्दे वेगवेगळे असले तरी जवळपास सर्वच निवडणुका व्यक्त ...
पहिल्यांदा पश्चिम बंगाल मधून निवडून आलेले गुप्ता यांनी पुढेही ११ वेळा खासदार होण्याचा इतिहास रचला. इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात १२ वेळा निवडणुका लढवल्या आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) कडून इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या सर्व निवडणुक लढ ...