शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
5
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
6
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
7
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
8
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
9
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
10
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
12
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
13
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
14
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
15
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
16
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
17
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
18
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
19
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
20
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत नेमका गद्दार कोण?; केडीएमसीच्या स्थायी समितीत पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 01:05 IST

राज्यातील महाविकास आघाडीमुळे महापालिकेत शिवसेना व भाजपने फारकत घेतली आहे. त्यात कोट यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे चार सदस्य व एक अपक्ष यांच्यासह पाच सदस्यांनी त्यांची जागा विरोधी सदस्य बसतात,

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे हे प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर राहिले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गणेश कोट यांचा पराभव झाला होता. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेतील गद्दार कोण, या प्रश्नाचे पडसाद उमटले.

कोट यांच्या पराभवानंतर शुक्रवारी प्रथमच स्थायी समिती सभा झाली. भाजपचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांची ही पहिलीच सभा होती. मात्र, गटनेत्यांची सातव्या आयोगाच्या मंजुरीसंदर्भात महापौर दालनात आयुक्तांसोबत बैठक सुरू असल्याने स्थायी समितीची सभा सुरू होण्यास एक तासाचा विलंब झाला. सभा सुरू होण्यापूर्वी सर्वप्रथम कोट येऊन बसले होते. ते त्यांच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या वामन म्हात्रे यांची वाट पाहत होते. सभापती येताच सभा सुरू झाली. त्यावेळी सभापती व सदस्यांचे उपायुक्त मारुती खोडके यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडीमुळे महापालिकेत शिवसेना व भाजपने फारकत घेतली आहे. त्यात कोट यांचा पराभव झाल्याने शिवसेनेचे चार सदस्य व एक अपक्ष यांच्यासह पाच सदस्यांनी त्यांची जागा विरोधी सदस्य बसतात, त्या दिशेला ठरविली. मात्र, कोट यांनी वामन म्हात्रे यांना उद्देशून गद्दाराला बाजूला बसवा, असे वक्तव्य केले. त्यावेळी वामन म्हात्रे यांनी महापालिकेत सगळेच गद्दार आहेत, असे बोलून कोट यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन सभापती म्हात्रे यांनी दोघांनाही शांत राहण्याचे आवाहन केले.

पत्रकारांशी बोलताना गणेश कोट म्हणाले की, वामन म्हात्रे यांच्या गैरहजेरीमुळे माझा पराभव झाला. पक्षाने त्यांच्यावर अद्याप कारवाई केली नाही. पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी पुन्हा मी मागणी केली. वामन म्हात्रे म्हणाले की, मी २५ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. माझी प्रकृती ठीक नसल्याने मी निवडणुकीस गैरहजर राहणार आहे, याची पूर्वकल्पना पक्षाला दिली होती. मी गद्दारी केलेली नाही. याउलट, कोट यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पुन्हा २०१५ च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे गद्दार मी का ते, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना