शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये चार दिवस पाणी बंद

By admin | Updated: February 22, 2016 00:40 IST

एमआयडीसीच्या अनियमित पाणीपुरवठ्याचा फटका उल्हासनगरला बसला असून चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने अक्षरश: हाहाकार उडाला. कसाबसा चौथ्या दिवशी दुपारनंतर

उल्हासनगर : एमआयडीसीच्या अनियमित पाणीपुरवठ्याचा फटका उल्हासनगरला बसला असून चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने अक्षरश: हाहाकार उडाला. कसाबसा चौथ्या दिवशी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू झाला, पण तोही कमी दाबाने असल्याने पाण्यासाठीची महिलांची वणवण थांबलेली नाही. एरव्ही, आरोग्यास घातक असलेले हातपंप आणि विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी रात्रभर शेकडो नागरिकांनी जलकुंभांवर ठाण मांडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. उल्हासनगरच्या पूर्व भागाला पाले आणि जांभूळ गावातील जलकुंभातून, तर पश्चिमेला शहाड-टेमघर येथून पाणीपुरवठा होतो. पूर्व भागातील पुरवठा सलग गुरुवार, शुक्रवारी, तर पश्चिमेचा मंगळवार, शुक्रवारी बंद ठेवला जातो. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्या फुटल्याने पाणीपुरवठा बंद असल्याचे कारण एमआयडीसीने दिले. रविवारी दुपारनंतर पाणीपुरवठा कसाबसा सुरू झाला. मात्र, कमी दाबाने पुरवठा होत असल्याने पाणीप्रश्न पूर्ण सुटलेला नाही. तीन दिवस पाणी नसल्याने पिण्यासाठी हातपंप आणि विहिरींतून पाणी उपसण्याची वेळ आली. शहरातील हातपंप व विहिरींचे पाणी आरोग्याला घातक असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. पिण्याऐवजी भांडी आणि कपडे धुण्यासाठी त्याचा वापर करावा, असे सुचवले होते. मात्र, सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी तेही पाणी पिण्यासाठी वापरले. एमआयडीसीच्या लहरीपणाचा धसका पालिकेने घेतला असून सध्याच्या स्थितीत नागरिक मागणी करतील, त्या ठिकाणी बोअरवेल खोदण्यास परवानगी दिली आहे.पाण्यासाठी रात्रभर जागरणसलग तीन दिवस पाणी न आल्याने शनिवारी पिण्यासाठी तरी पाणी येईल, या आशेपोटी नागरिकांनी नळांसमोर रात्र जागून काढली. शेकडो नागरिकांसह नगरसेवकांनी जलकुंभावर ठाण मांडून रात्रभर पाण्याची प्रतीक्षा केली. महिलांना पिण्याच्या पाण्याच्या एका हंड्यासाठी पायपीट करावी लागली.हातपंप, विहिरी वरदानशहरात सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. झोपडपट्ट्यांत पाणी साठवण्यासाठी पुरेशी भांडी नसल्याने त्यांचे सर्वाधिक हाल झाले. पाणीप्रश्न इतका तीव्र होता की, चार-पाच वर्षांची मुले पाणी भरण्यासाठी आईवडिलांनी मदत करत असल्याचे चित्र होते. मुंब्रा-कळव्यासह ठाणेकरांना दिलासाडोंबिवली एमआयडीसीच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना शनिवारी रात्री अचानकपणे तेथे शॉर्टसर्किट होऊन जलवाहिनी फुटली. हजारो लीटर पाणी वाया गेले. ते खिडकाळी भागातील आसपासच्या शेतीसह काही घरांमध्ये घुसल्याने गोंधळ उडाला. यात दोन झोपड्या वाहून गेल्याचे वृत्त आहे. रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडल्याने एकाच वेळी शॉर्टसर्किटमुळे वीजवाहिनीची दुरुस्ती, जलवाहिनीची दुरुस्ती हाती घ्यावी लागली. शिवाय, अंधारामुळे मदतकार्यासह दुरुस्तीतही अनेक अडथळे निर्माण झाले. १८७२ एमएम व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम एमआयडीसीने शुक्रवारपासून सुरू केले होते. ती शनिवारी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठ्याला फटका बसण्याची चिन्हे लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. रविवारी पहाटे ४ पर्यंत ते काम सुरू होते. दुरुस्तीच्या कामानंतर चाचणी घेण्यात आली आणि खात्री झाल्यावर पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे डोंबिवलीसह कळवा, मुंब्रा, ठाण्याच्या काही भागाला कोणत्याही प्रकारे पाण्याची समस्या उद्भवू दिली नाही, असा विश्वास डोंबिवली एमआयडीसीचे अभियंता शंकर जगताप यांनी व्यक्त केला. त्या जलवाहिनीतून २४ तास पाणीपुरवठा होतो. मात्र, दुरुस्ती झाल्याने कोणत्याही भागातील एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.