शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा बळी , घोडबंदर मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:15 IST

घणसोली येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घोडबंदर मार्गावर अपघात होऊन चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.

नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घोडबंदर मार्गावर अपघात होऊन चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.
रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमुळे हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमुळे सदर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घणसोली सिम्प्लेक्स येथील माउलीकृपा सोसायटीत राहणाºया विक्रांत दास यांच्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. ते पत्नी अंजू व अडीच वर्षांचा मुलगा वेदांत यांच्यासोबत मोटारसायकलवरून बोरीवलीच्या दिशेने चालले होते. विक्रांत यांची बहीण त्याठिकाणी राहत असून, रक्षाबंधनासाठी ते तिच्याकडे चालले होते. घोडबंदर मार्गावरील वेदांत रुग्णालयासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमध्ये दुचाकीचा टायर अडकून अपघात झाल्याचे विक्रांत दास यांनी सांगितले. या वेळी तिघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये मुलगा वेदांत याचा मृत्यू झाला. तर पत्नी अंजू गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू असून शनिवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दुर्घटनेमुळे दास कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे घडलेल्या या घटनेप्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणीही होत आहे.

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे