शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के; मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 14:15 IST

सदानंद नाईक  उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के ...

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त आहे. तर मृत्यू दर सव्वा २ टक्के पेक्षा कमी आहे. कोरोना पोझीटीव्ह रुग्ण संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत असल्या तरी चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची टीका होत आहे. 

उल्हासनगरात कोरोना रुग्णाच्या संख्या झपाट्याने कमी झाली असून लॉकडाऊन काळात वाढ झाली होती. त्याचा ताण आरोग्य सुविधेवर पडून राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू होऊन आरोग्य विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच नवनियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कारभारावर टीका झाली. मात्र आयुक्तांनी सर्वपक्षीय स्थानिक नेते, नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवित एक विशेष आराखडा तयार केला. अखेर आयुक्तांच्या पर्यंत्नाला यश येवून पाॅझिटीव्ह कोरोना रुग्णाला ब्रेक लागला. दरम्यान कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त झाले. तसेच मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी झाला आहे. आयुक्तांच्या कामाचे कौतुक शहरातून होत असताना, विशिष्ठ एका अधिकाऱ्यांना महत्त्व दिल्याची टिका सर्वस्तरातून होत आहे.

 शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या ७ हजार ११४ पेक्षा जास्त असून त्यापैकी ६ हजार ३७८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. तर आजपर्यंत १५४ जणाचा मृत्यू झाला. तसेच ५८२ रुग्णावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी फक्त ७० टक्के पेक्षा जास्त रुग्णांना ,सौंम्य व अतिसौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. तर ८७ रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असून २७० रुग्णांवर महापालिका क्षैत्राबाहेरील रूग्णालयात उपचार सुरू आहे. एकूणच शहर कोरोना मुक्तिकडे वाटचाल करीत आहे. असे बोलले जात आहे. नागरिकांनी काम असेलतर घरा बाहेर पडा. असे आवाहन महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी केले आहे. दरम्यान कोरोना चाचण्या कमी होत असल्याने, रुग्णाची संख्या कमी असल्याची टिका शहरातून होत आहे. 

चौकट 

शेजारील शहरापेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त

 शेजारील ठाणे, कल्याण, मिरा - भाईंदर, अंबरनाथ आदी पालिके पेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात जास्त आहे. तसेच पोझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाल्याचे चित्र आहे. याबाबतची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.