शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
2
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
3
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
4
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
5
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
6
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
7
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
8
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
9
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
10
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
11
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
12
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
13
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
14
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
15
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
16
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
17
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
18
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
19
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
20
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...

वरसावे पुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी; पाण्याचे टँकरही मिळेनासे झालेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 2:42 PM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबरपासून पूल बंद करून त्यावरील दोनपैकी एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे

भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन पुलाच्या दुरुस्तीसाठी ७ डिसेंबरपासून पूल बंद करून त्यावरील दोनपैकी एकच मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. यामुळे पुलाच्या वसई-विरार क्षेत्रातील बाजुकडे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागल्याने स्थानिक चाकरमानी, विद्यार्थ्यांना मीरा-भार्इंदर, ठाणे येथील कार्यालयांसह शाळेत पोहोचण्यासाठी विलंबाचा फटका बसू लागला आहे. अशातच पाण्याचे टँकरही मिळेनासे झाल्याने परिसरात पाण्याची  टंचाई निर्माण झाली आहे. 

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) २००२ मध्ये वरसावे येथील घोडबंदर नदीवर बांधलेल्या वाहतूक पूलाच्या दोन स्प्रींग बदलण्यासाठी ७ डिसेंबरपासून पूलावरील अवजड वाहतूक बंद केली आहे. तसेच या पुलावरील दोन पैकी एक मार्गिकाच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवली आहे. त्याच्या लगत असलेल्या जुन्या पुलावरील मुंबईकडून येणारी वाहतूक सुरू ठेवल्याने मीरा-भार्इंदर क्षेत्रातील वरसावे वाहतूक बेटावर वाहतूक कोंडीचा त्रास तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याउलट पुलाच्या दुसऱ्या टोकावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने पुर्वीपेक्षा ती सुमारे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मालजीपाड्यापर्यंत वाढली आहे. याचा सर्वात जास्त फटका तेथील स्थानिकांना बसू लागला आहे. 

येथील चाकरमान्यांना मीरा-भार्इंदरसह ठाणे व मुंबई येथे नोकरीसाठी जावे लागते. तर विद्यार्थ्यांना मीरा-भार्इंदर क्षेत्रातील शाळांत यावे लागते. येथील लोकांना मीरा-भार्इंदर शहर सोईचे ठरते. त्यामुळे येथील विद्यार्थी मीरा-भार्इंदरमधील शाळा व महाविद्यालयांत शिकण्यासाठी मोठ्याप्रमाणात येतात. तसेच येथील अनेक कुटूंबांना पाण्यासाठी नळजोडणी नसल्याने त्यांना वसई-विरार क्षेत्रातील मालजीपाडा तर मीरा-भार्इंदर येथील काशिमीरा परिसरातून पाण्याचे टँकर मागवावे लागतात. मालजीपाडा येथून टँकर पोहोचण्यास किमान ४ ते ५ तास लागत असल्याने पुर्वी येणारे टँकर वाहतुक कोंडीमुळे येईनासे झाले आहेत. काशिमीरा येथून येणाऱ्या टँकरला येताना वाहतूक कोंडीचा फटका बसत नसला तरी परत जाताना मात्र वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे तेथील टँकरसुद्धा बंद करण्यात आल्याने येथे कृत्रिम पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. येथील अनेकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्याने त्यांची वाहने मुंबई, ठाणे येथे पूलाच्या दुरुस्तीपुर्वी दररोज तीन ते चार फेऱ्या करीत होते. या कोंडीमुळे त्या वाहनांची एकच फेरी होत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. 

 

पुलाची दुरुस्ती लवकर पुर्ण करुन स्थानिकांना दिलासा द्यावा. तत्पुर्वी उद्भलेल्या वाहतूक कोंडीतून किमान स्थानिक विद्यार्थ्यांच्या बस तसेच पाण्याच्या टँकरला प्राधान्य दिले जावे. अनेक लोकं पुलावरुनच पायपीट करु लागले असुन रात्रीच्या वेळी पूलावर अंधार असल्याने त्यांच्या जीवीताला धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पूलावर पुरेशा उजेडाचे दिवे बसविले जावेत. राजेंद्र ठाकूर, स्थानिक समाजसेवक

 

वसई-विरार क्षेत्रातील पूलाच्या बाजूकडील बहुतांशी विद्यार्थी आपल्या शाळेत येतात. त्यांना वाहतुक कोंडीमुळे विलंब होऊ लागला आहे. वाहतुक कोंडी सुसह्य होण्यासाठी सरकारी यंत्रणेकडे सतत पाठपुरावा केला जात असुन त्यावर सकारात्मक कारवाई होत नाही. केशव घरत, राजा शिवाजी विद्यालयाचे संस्थापक 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर