शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पाणी चोरीला ‘अभय’

By admin | Updated: January 6, 2016 01:07 IST

अनधिकृत नळ जोडणीसाठी राबविण्यात येत असलेली अभय योजना प्रशासनाने बंद करुन अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाणे : अनधिकृत नळ जोडणीसाठी राबविण्यात येत असलेली अभय योजना प्रशासनाने बंद करुन अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा नळजोडणीच्या बाजूने मंगळवारी स्थायी समितीचे काही सदस्य उतरले. मात्र, अभय योजनेच्या माध्यमातून ब्लॅकमेलींग करु पाहणाऱ्या ग्राहकांना अभय का द्यायचे असा मुद्दा उपस्थित करुन प्रशासनाने या योजनेला अभय देण्यास नकार दिला. परंतु, केवळ यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, तिला मुदतवाढ द्यावी अशी मागणी सदस्यांनी रेटून धरली. ठाणे महापालिकेने पाणी बिलाची वसुली करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या, थकबाकीदारांचे कनेक्शन तोडण्याची कारवाई पालिकेने सुरु आहे. परंतु, पाण्याचे बिलच आले नसतांना अशा प्रकारे कारवाई का केली जात आहे, असा सदस्य रामभाऊ तायडे यांनी प्रशासनाला केला. तर अनधिकृत कनेक्शन तोडण्याऐवजी त्यांना अभय योजनेत आणा अशी भूमिका सदस्य संजय वाघुले यांनी मांडली. दरम्यान, काही ग्राहकांना मागील १० वर्षापासून पाण्याची बिलेच वितरत केली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. ती दिली तर ग्राहक ते भरतील. परंतु, पैसे भरण्यासाठी जर ग्राहक प्रभाग समिती कार्यालयात गेले तरीदेखील आधी बिल आणा अशी मागणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे ही कारवाईची मोहीम थांबवून प्रथम ग्राहकांना बिलांचे वाटप करावे अशी मागणीही सदस्यांनी केली. मात्र, पाणी विभागाचे मते आमच्याकडून ही कारवाई सुरु असून बिले वाटपाचे काम हे कर विभागाकडून केले जात आहे. त्यांच्याकडून हे काम होत नसल्यानेच अशा प्रकारे सरसकट ग्राहकांवर कारवाई करावी लागत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. त्यामुळे ज्यांची थकबाकी असेल अथवा जे अभय योजनेत असतील त्यांच्यासाठी त्याच ठिकाणी बिले देण्याची परवानगी देऊन ग्राहकांनाही पुढील तीन दिवसात बिल भरण्याची मुदत दिल्यास हा प्रश्न सुटणार असल्याचा दावा त्यांनी केला. या संदर्भातील पत्र वरीष्ठांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, त्यांनीच कारवाईचे आदेश दिल्यानेच कारवाई करावीच लागते असेही त्यांनी स्पष्ट केले. यावर उपाय म्हणून अभय योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी, वाघुले यांनी पुन्हा लावून धरली. तर दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी मात्र या योजनेला विरोध करून थकबाकीदारांवर कारवाई करा अशी मागणी केली. त्यानुसार अशा प्रकारे अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी ठेवून वर्षानुवर्षे फुकट पाणी वापरणाऱ्या आणि ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांसाठी ही योजना बंदच असणे योग्य असल्याचे मत प्रभारी आयुक्त अशोक रणखांब यांनी व्यक्त केले.