शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

पहिल्याच सामन्यात पावसाची ‘सेंच्युरी’, रेल्वे कूर्मगतीने, वीजपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 1:24 AM

महिनाभर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांना पहिल्याच सामन्यात पावसाने सेंच्युरी (१५०.८८ मिमी) ठोकून सुखद धक्का दिला.

ठाणे/उल्हासनगर - महिनाभर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणेकरांना पहिल्याच सामन्यात पावसाने सेंच्युरी (१५०.८८ मिमी) ठोकून सुखद धक्का दिला. एकीकडे पावसाच्या आगमनामुळे सर्वसामान्य सुखावले असताना, दुसरीकडे संततधार पावसाने उल्हासनगरातील नालेसफाईची पोलखोल होऊन फर्निचर मार्केटमधील नाला तुंबल्याने दुथडी भरून वाहू लागला आणि फर्निचर मार्केटला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. नाल्यातील पाणी अनेक दुकानांत शिरल्याने लाखो रुपयांच्या फर्निचरचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून परिसरातील विद्युतपुरवठा खंडित केल्याने १८०० घरांमधील नागरिकांना अंधारात राहावे लागले. सेंच्युरी शाळेजवळ वीज पडून गजेंद्र गोद्रा हा जखमी झाला.रस्ते व पुलांच्या अर्धवट अवस्थेत राहिलेल्या कामांमुळे मुरबाड व शहापूर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी साचून १५ गावे आणि २० आदिवासीवाड्या-वस्त्यांचा संपर्क तुटला. तर, ठाणे शहरात १२, तर कल्याण-डोंबिवली परिसरात १३ वृक्ष उन्मळून पडले. पहाटेपासून पावसाने जोर धरल्याने मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक सकाळपासून १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. परिणामी, सकाळी व सायंकाळी गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल झाले.पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचा बोजवारा उडण्याचे भाकीत सोशल मीडियावर नागरिकांनी व्यक्त केले होते. त्याचे प्रत्यंतर शुक्रवारी पावसाने नाले व गटारे ओव्हरफ्लो होऊन फर्निचर मार्केट बुडाल्याने आले. तेथून वाहणारा नाला रात्री तुंबल्याने, त्यातील पाणी रस्त्यावरून वाहू लागले. फर्निचर मार्केट व कॅम्प नं.-१ परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवला. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी जेसीबीद्वारे नाल्यावरील स्लॅब तोडून नाल्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर फर्निचर मार्केटमधील पाण्याचा निचरा झाला. फर्निचर मार्केटसह, गुलशननगर, कॅम्प नं.-३, स्टेट बँकेसमोरील मुख्य रस्ता, मयूर हॉटेल, शहाड स्टेशन परिसर यांच्यासह अनेक भागांत पाणी साचून तलावाचे स्वरूप आले होते. सेंच्युरी शाळेची संरक्षक भिंत पडली असून तेथील एका झाडावर वीज पडून झाडाखाली उभा असलेला गजेंद्र गोद्रा हा जखमी झाला. त्याच्यावर सेंच्युरी कंपनीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहापूर-मुरबाड वाहतूक ठप्पशेणवा/किन्हवली : रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या शहापूर-मुरबाड रस्त्याच्या रु ंदीकरण व नूतनीकरणाचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीने अक्षम्य बेपर्वाई करत रस्त्याचे काम कूर्मगतीने सुरू ठेवल्याने रस्त्यांची अनेक कामे रखडली व परिणामी शुक्रवारी मुरबाड-शहापूर या तालुक्यांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने १५ गावे व २० आदिवासी वस्त्यावाड्यांचा संपर्क तुटला. शुक्र वारी मुसळधार पावसात सर्वत्र खोदून ठेवलेला व पर्यायी तयार केलेला रस्ता पाण्याखाली गेला.ंच्परिणामी, वाहतुकीसाठी मार्ग बंद केला. संपूर्ण रस्त्यावर चिखल व पाणीचपाणी झाल्याने या मार्गावरील वाहतूकसेवा ठप्प झाली. त्यामुळे १५ गावे व २० आदिवासी वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला. परिसरातील नडगाव ,गोकुलगाव, लेनाड बु, लेनाड खु, भटपाडा, नेहरोली, जांभा, शेंद्रूण, ठिले, टेंभरे, कलगाव, दहिवली, भागदल, अल्यानी, चिंचवली, गेगाव आणि नांदवल या गावांतील चाकरमानी, विद्यार्थी, दूधविक्रेते, मजूर यांना वाहतूक ठप्प झाल्याने शहापूर शहराकडे येता आले नाही. शेकडो वाहने अडकून पडली.वालधुनी नदीपात्रातील अवैध बांधकामांनी आला पूरसंततधार पाऊस आणि वालधुनी नदीपात्रातील अवैध बांधकामांमुळे उल्हासनगरला पुराचा फटका बसल्याची चर्चा आहे. येथील बंद असलेल्या हरमन मोहता कंपनीच्या जागेतील नाल्याचा प्रवाह अवैध बांधकाम करणाऱ्यांनी बदलून नाला अरुंद केल्याने, शेजारील झोपडपट्टीत पाणी घुसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.केडीएमसी हद्दीत १३ झाडे पडलीकल्याण/डोंबिवली : पावसामुळे केडीएमसी हद्दीत १३ झाडे आणि विजेचा एक खांब पडला. कल्याण पूर्वेतील कर्पेवाडीतील तीन मजली नायर इमारतीच्या जिन्याचा भाग पावसामुळे कोसळला. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने केडीएमसीचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. तसेच पूर्वेतील लोकग्रामचा नवा रस्ता शुक्रवारी खचल्याने त्यात ओंकार शाळेच्या बसचे चाक रुतले. मात्र, बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला. कल्याण-आग्रा रोडवरील ‘जय हरी’ ही अतिधोकादायक इमारत भरपावसात जमीनदोस्त करण्याचे काम करण्यात आले. टिटवाळा, बल्याणी परिसरातील चाळींमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे