शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात अभय योजनेला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:16 IST

उल्हासनगर : मालमत्ता कर विभागासाठी लागू केलेल्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून, गेल्या ११ दिवसांत फक्त १० कोटी ...

उल्हासनगर : मालमत्ता कर विभागासाठी लागू केलेल्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला असून, गेल्या ११ दिवसांत फक्त १० कोटी तर एकूण ४७ कोटींची वसुली झाली आहे. कर निर्धारक - संकलक जेठानंद करमचंदानी यांनी अभय योजनेत आजपर्यंत १० कोटींची वसुली झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, वसुलीसाठी प्रशासन अधिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

उल्हासनगरवासीयांना कोरोना काळात दिलासा देण्यासाठी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी पुढाकार घेऊन मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लावण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. गेल्या महिन्यात महापौर, उपमहापौर, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन टप्प्यांतील अभय योजना जाहीर केली. तसेच ३१ मार्चअखेर वसुलीचे लक्ष्य १०० कोटींचे ठेवले आहे. १८ फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान ८० टक्के तर ८ ते ३१ मार्चदरम्यान ५० टक्के मालमत्ता कर बिलावरील व्याज माफ अशी दोन टप्प्यांतील अभय योजना जाहीर केली. मालमत्ता कर विभागाची एकूण थकबाकी ५२० कोटींपेक्षा जास्त असून १ लाख ७७ हजार एकूण मालमत्ताधारक शहरात आहेत.

कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महासभेत अभय योजना लागू करण्याचा प्रस्ताव आणला होता. गेल्या महिन्याची महासभा सुरू होण्यापूर्वी महापौर, उपमहापौर यांनी अभय योजना जाहीर करून नागरिकांना दिलासा दिला. जास्तीतजास्त वसुली होण्यासाठी योजनेची जनजागृती करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया करमचंदानी यांनी दिली. तसेच एका खाजगी कंपनीकडून मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू असून मालमत्तेची वसुली वाढण्याचे संकेत शिवसेना नेते अरुण अशान यांनी दिली.

चौकट

मालमत्ता कर वसुलीचा विक्रम मोडणार?

अभय योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे उपायुक्त मदन सोंडे व कर निर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी केले आहे. तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असल्याने वसुलीचे विक्रम मोडणार असल्याची प्रतिक्रिया सोंडे यांनी दिली.