शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

शनिवार-रविवारचा पाणीबंद मागे?

By admin | Updated: February 11, 2016 02:46 IST

शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे

डोंबिवली : शनिवार, रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतर आणि सोमवारी कमी दाबाने पाणी दिल्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याने शनिवार-रविवारची कपात मागे घेऊन पाणीकपातीचे जुनेच वेळापत्रक पुन्हा लागू केले जाण्याची चिन्हे बुधवारच्या लघू पाटबंधारे, स्टेम, एमआयडीसीसह विविध पालिकांच्या स्टेम बैठकीनंतर दिसू लागली आहेत. दरम्यान, या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. उल्हास नदीपात्रातून पाणी उचलण्याच्या वाराचे एकत्रीकरण करून शनिवारी-रविवारी पाणी बंद ठेवल्यानंतरही मीरा भाईंदर पालिकेने सरकारी निर्णयाचा आधार घेत पाणीकपात परस्पर मागे घेतल्याने आणि स्टेमनेही बेसुमार उपसा सुरू ठेवल्याने कल्याण-डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र सलग दोन दिवस पाणी बंद ठेवून फारसा फरक पडणार नसेल तर पूर्वीचेच वेळापत्रक पुन्हा लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीसह विविध पालिकांनी लावून धरली आहे. उल्हास नदीच्या पाणीच्या पातळीत झपाट्याने घट होत असून त्यावर उपाय सुचवण्यासाठी लघू पाटबंधारे, एमआयडीसी आणि कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्याने पाण्यावरून महापालिकांत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेने पाणीप्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. शनिवारी, रविवारी पाणी बंद, सोमवारी कमी दाबाने पाणी आणि मंगळवारी, बुधवारीही पाण्याचा ठणठणाट असल्याने कल्याण-डोंबिवलीतील लोकप्रतिनिधींना टंचाईचा सामना करावा लागला. नदीच्या पाण्याची पातळी कमी होत ती उणे १३० सेंटीमीटरने खाली आल्याने पालिका अडचणीत आली आहे. जास्तीचा पाणीउपसा करणाऱ्या यंत्रणांविरोधात लघू पाटबंधारे खाते कारवाई करत नाही. मीरा-भाईंदर पालिका पाणीकपात लागू करीत नाही. शनिवार-रविवारचा पाणी बंद पाळत नाही, असा ठपका कल्याण-डोेंंबिवली पालिकेने ठेवला. त्याची गंभीर दखल शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. त्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह एमआयडीसी, लघू पाटबंधारे यांच्यासोबत डोंबिवलीतील एमआयडीसीच्या कार्यालयात सायंकाळी बैठक घेतली. सर्वच पालिकांना पाणी कपात लागू करा, त्यानंतरही जादा पाणी उचलणाऱ्यांवर काय कारवाई करणार ते स्पष्ट करा, अन्यथा कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांसह शिवसेना पाण्यासाठी आंदोलन करेल, असा इशारा शिंदे, देवळेकर यांनी दिला.