शहरं
Join us  
Trending Stories
1
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
2
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
3
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
4
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
6
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
7
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
8
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
9
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
10
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
11
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
12
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
13
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
14
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
15
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
16
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
17
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
18
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
19
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
20
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक वाहनांना रस्ते दिले आंदण; बेकायदा पार्किंगकडे यंत्रणांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 00:59 IST

बोस मैदानासमोरील रस्ता रुंदीकरणासाठी येथील झोपड्या हटवून पात्र बाधितांना पक्की घरे पालिकेने दिली. परंतु, रुंदीकरण होऊनही या ठिकाणी पदपथावर झोपडीधारकांनी अतिक्रमण केले आहे.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेस सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ विकसित केलेले रस्ते हे लहानमोठ्या वाहनांना फुकटात आंदण दिले आहेत. या भागातील रस्त्यांवर सर्रास बस, डम्पर, कचरागाड्या, रिक्षांच्या बेकायदा पार्किंगचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

बोस मैदानासमोरील एक मुख्य रस्ता भार्इंदर स्थानक ते उत्तन असा जातो. तर, एक ४५ मीटर रुंद रस्ता असून मैदानासमोरून तो उत्तन, भार्इंदर उड्डाणपूल असा जातो. हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे आणि वर्दळीचे आहेत. या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी तर वाहनांची संख्या अधिक असते.

बोस मैदानासमोरील रस्ता रुंदीकरणासाठी येथील झोपड्या हटवून पात्र बाधितांना पक्की घरे पालिकेने दिली. परंतु, रुंदीकरण होऊनही या ठिकाणी पदपथावर झोपडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. तर, रस्त्याच्या दोन्ही बाजूलाच नव्हे तर रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला लागूनही सर्रास बेकायदा वाहने उभी केली जातात. गॅरेज आदी व्यवसाय थाटले आहेत. मैदानाजवळील रस्त्यावर बस, ट्रक यांच्या रांगा लागलेल्या असतात. अगदी निम्मा रस्ताच या मोठ्या वाहनांनी व्यापलेला असतो. यामुळे नेहमीच अपघाताची भीती असते.
भार्इंदरकडून मुर्धा-उत्तनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला तर थेट कांदळवनात भराव करून भूखंड तयार केले असून त्या ठिकाणी सर्रास पालिका कंत्राटदाराच्या कचºयाच्या गाड्या, रिक्षा, बस, टेम्पो आदी वाहनांचे अतिक्रमण झालेले आहे. येथेही गॅरेजचे काम केले जाते. पालिकेने पाच लाख खर्चून बांधलेले स्टीलचे बसथांबेही या कचºयाच्या गाड्यांनी धडक मारून तोडले आहेत. पालिकेने येथे तारेचे कुंपण घातले होते, तेही पाडून टाकले आहे. यात पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असताना बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच नगरसेवक गप्प आहेत. अजूनपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही.

या भागात सर्रास होणाºया व्यावसायिक वाहनांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगमुळे नागरिक त्रासलेले असताना त्यांना पाठीशी घालण्याचे काम नगरसेवक, पोलीस प्रशासन करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.