शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

कृषी योजनांच्या निधीत २४९ कोटींच्या कपातीचा नांगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 05:56 IST

आघाडी सरकारचा निर्णय । शेतकऱ्यांत नाराजी; फळ उत्पादक ांना फटका बसणार

नारायण जाधव 

ठाणे : कोरोनाच्या महामारीमुळे आलेल्या आर्थिक अरिष्टामुळे राज्यातील मोठ्या खर्चाचे विकास प्रकल्प थांबविण्याचे किंवा ते काही काळासाठी स्थगित करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. याचा सर्वांत मोठा फटका आता कृषीक्षेत्राला बसला आहे. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मिरवणाºया महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या नावाखाली कृषीविकासाच्या चार योजनांवरील निधीत तब्बल २४९ कोटी १४ लाख ४४ हजारांची कपात केल्याने ठाणे-पालघरसह राज्यातील शेतकºयांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या निर्णयाचा मोठा फटका शेतकºयांत लोकप्रिय असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानास बसला आहे. केंद्र शासनाकडून मिळणाºया ६० टक्के अनुदानाच्या बळावर २०१५ पासून हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकºयांना फळे, भाजीपाला, नारळ, काजू, सुगंधी वनस्पती पिकविण्यासाठी अनुदान देण्यात येते. त्यातून शेतकरी भरघोस उत्पादन घेतात. यात ठाणे व पालघर जिल्ह्यासह राज्यातील शेतकºयांना मोठा लाभ होतो. यंदाच्या आर्थिक वर्षात यासाठी १९६ कोटी ५८ लाख १० हजारांची अर्थसंकल्पीय तरतूद केली होती. मात्र, यापैकी ३३ टक्के निधीस मान्यता दिली आहे. ही रक्कम ६४ कोटी ८७ लाख १७ हजार असून यात तब्बल १३१ कोटी ७० लाख ९३ हजारांची कपात केली आहे.अशाच प्रकारे पंजाबराव देशमुख जैविक व विषमुक्त शेती अभियानासाठी २० कोटी ७५ लाख ९७ हजारांच्या तरतुदीपैकी केवळ १० टक्के अर्थात दोन कोटी सात लाख ५९ रुपये निधी मंजूर करून १८ कोटी ६८ लाख ३८ हजारांची कपात करण्यात सरकारने धन्यता मानली आहे. तर, माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने सुरू केलेल्या फळबागलागवड योजनेसाठीच्या १०० कोटी अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी २० टक्के म्हणजे अवघे २० कोटी रुपये वितरित केले आहेत. याचा फटका ठाणे-पालघरसह कोकणातील नारळ, काजू, आंबा, चिकू, उत्पादक शेतकºयांना बसणार आहे.कृषी विद्यापीठांच्या संशोधन निधीतही कपातकृषीक्षेत्रातील संशोधनासाठी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान देण्यात येते. यंदा अर्थसंकल्पात त्यासाठी २५ कोटींची भरघोस तरतूद केली होती. मात्र, कोरोनाच्या आर्थिक मंदीचे कारण दाखवून या निधीत १८ कोटी ७५ लाखांची कपात करून अवघे सहा कोटी २५ लाख रुपये मंजूर केले आहेत.कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन अनेक योजनांचा निधी कमी करावा लागत आहे. मात्र, आम्ही शेतकºयांसाठी ठिबक सिंचन यासारख्या महत्त्वाच्या योजनांना प्राधान्य देत आहोत. शेतकºयांची गैरसोय होऊ नये, हा सरकारचा उद्देश आहे. - दादा भुसे, कृषिमंत्री

कोरोनाचे सर्वांत मोठे संकट शेतकºयांवर आहे. आधीच केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. असे असताना शेतकरी योजनांना कात्री लावणे चुकीचे आहे. उलट कर्जमाफीसह सर्वच कृषी योजनांचा निधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढविणे गरजेचे आहे.- डॉ. अजित नवले, सरचिटणीस, किसानसभा

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी