शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट होऊनही मृतांची संख्या २० ने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:57 IST

पाच वर्षांत २५३८ अपघात : १२२२ जणांचा मृत्यू, जखमींची संख्या झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत दोन हजार ५३८ रेल्वे अपघात झाले. यामध्ये एक हजार १२२ जणांचा बळी गेला असून एक हजार ४१६ जण जखमी झाले आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघातांची संख्या २९ ने घटली असली तरी मृतांची संख्या मात्र २० ने वाढली आहे. जखमींची संख्याही ४९ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरी ते दिवा आणि दिवा ते निळजे अशी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द पसरली आहे. ही हद्द पूर्णपणे कुठेही बंदीस्त नसल्याने रेल्वे रूळाशी नागरिकांचा संपर्क येताना दिसतो. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे असो वा कळवा, मुंब्रा आणि दिवा या रेल्वेस्थानकांवर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. ठाण्यातून रेल्वेने दररोज ८-९ लाख प्रवासी येजा करतात. सकाळी आणि सायंकाळी लोकलला असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी अक्षरश: लटकून येजा करतात. यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना होणाºया अपघातांमध्ये मध्यंतरी वाढ झाली होती.जीआरपी आणि आरपीएफची जनजागृतीच्अपघात रोखण्यासाठी ठाणे जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरीत्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवून जनजागृती मोहीम हाती घेतली. त्याचबरोबर रेल्वेस्थानकातील शॉर्टकट बंद करण्यावरहीभर दिला.च्२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण कमी झाले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवणेही जोखमीचे काम असते. त्यांना बेवारस न ठेवता त्यांची ओळख पुढे आणण्याचे काम प्रामुख्याने केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.मृतांची संख्या २० ने वाढली२०१८ मध्ये अपघातांमध्ये २०३ जणांचा बळी गेला होता. यातील ११४ जणांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली होती. २०१९ मध्ये ही संख्या २० ने वाढल्याने बळींची संख्या २२३ वर पोहोचली. मात्र, बेवारस मृतांची संख्या कमी होऊन ती संख्या ७० वर आली आहे. २०१८ मध्ये जखमींची संख्या ३१९ होती, २०१९ मध्ये ती ४९ ने कमी झाल्याची सूत्रांनी दिली.चिठ्ठीवरून बेवारसाची ओळखमध्यंतरी निळजे येथे झालेल्या एका अपघातात डोंबिवली येथे राहणारा अजयकुमार शर्मा (२८) याचा मृत्यू झाला होता. त्याच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीवरून तो मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याचे पुढे आले होते. चिठ्ठीवरील एका फोन नंबरवरून त्याची ओळख समोर आली.