शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट होऊनही मृतांची संख्या २० ने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:57 IST

पाच वर्षांत २५३८ अपघात : १२२२ जणांचा मृत्यू, जखमींची संख्या झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत दोन हजार ५३८ रेल्वे अपघात झाले. यामध्ये एक हजार १२२ जणांचा बळी गेला असून एक हजार ४१६ जण जखमी झाले आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघातांची संख्या २९ ने घटली असली तरी मृतांची संख्या मात्र २० ने वाढली आहे. जखमींची संख्याही ४९ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरी ते दिवा आणि दिवा ते निळजे अशी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द पसरली आहे. ही हद्द पूर्णपणे कुठेही बंदीस्त नसल्याने रेल्वे रूळाशी नागरिकांचा संपर्क येताना दिसतो. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे असो वा कळवा, मुंब्रा आणि दिवा या रेल्वेस्थानकांवर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. ठाण्यातून रेल्वेने दररोज ८-९ लाख प्रवासी येजा करतात. सकाळी आणि सायंकाळी लोकलला असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी अक्षरश: लटकून येजा करतात. यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना होणाºया अपघातांमध्ये मध्यंतरी वाढ झाली होती.जीआरपी आणि आरपीएफची जनजागृतीच्अपघात रोखण्यासाठी ठाणे जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरीत्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवून जनजागृती मोहीम हाती घेतली. त्याचबरोबर रेल्वेस्थानकातील शॉर्टकट बंद करण्यावरहीभर दिला.च्२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण कमी झाले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवणेही जोखमीचे काम असते. त्यांना बेवारस न ठेवता त्यांची ओळख पुढे आणण्याचे काम प्रामुख्याने केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.मृतांची संख्या २० ने वाढली२०१८ मध्ये अपघातांमध्ये २०३ जणांचा बळी गेला होता. यातील ११४ जणांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली होती. २०१९ मध्ये ही संख्या २० ने वाढल्याने बळींची संख्या २२३ वर पोहोचली. मात्र, बेवारस मृतांची संख्या कमी होऊन ती संख्या ७० वर आली आहे. २०१८ मध्ये जखमींची संख्या ३१९ होती, २०१९ मध्ये ती ४९ ने कमी झाल्याची सूत्रांनी दिली.चिठ्ठीवरून बेवारसाची ओळखमध्यंतरी निळजे येथे झालेल्या एका अपघातात डोंबिवली येथे राहणारा अजयकुमार शर्मा (२८) याचा मृत्यू झाला होता. त्याच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीवरून तो मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याचे पुढे आले होते. चिठ्ठीवरील एका फोन नंबरवरून त्याची ओळख समोर आली.