शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसी कामगारांचा लढा करणार अधिक तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:40 IST

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देण्यांसाठी २० दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ...

कल्याण : आंबिवली-मोहने येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांचे थकीत देण्यांसाठी २० दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी भेट दिली. कामगारांच्या या लढ्यास ‘वंचित’चा पाठिंबा असून, हा लढा अधिक तीव्र केला जाईल. कामगारांसोबत बैठक घेऊन या प्रकरणी कोणाची भेट घ्यायची हे ठरविले जाईल, अशी ग्वाही आंबेडकर यांनी या वेळी दिली.

या वेळी कामगार संघटनेचे प्रतिनिधी उदय चौधरी, भीमराव डोळ, रामदास वळसे आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, पाताळगंगा येथे आयपीएलचा प्लॅण्ट उभारला जातो. दुसरीकडे एनआरसी कंपनी बंद होऊन दहा वर्षे लोटली तरी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी दिली जात नाहीत. सरकार त्यासाठी काहीच करीत नाही. सरकारचे धोरण कामगारविरोधी आहे. सरकारच्या कामगारविरोधी आणि अन्य नागरिकांच्या विरोधातील धोरणांना जो विरोध करतो, त्याला जेलमध्ये टाकले जाते. ‘एनआरसी’च्या कामगारांची थकीत देणी देण्याऐवजी कामगार वसाहतीत राहणाऱ्यांची घरे तोडून त्यांना बेघर केले जात आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने निकाल देताना कामगारांना त्रास देऊ नका, असे स्पष्ट म्हटले आहे. तरीही पोलिसांना हाताशी धरून घरे तोडण्यात येत आहेत. पोलिसांनी कामगार जात्यात आहेत आणि ते सुपात आहे, असे समजू नये. त्यांच्यावरही अशी वेळ येऊ शकते. कामगारांना त्यांनी कायदेशीररीत्या सहकार्य करावे.

मुंबईपासून ७० किलोमीटरच्या अंतरात कोणतीही कंपनी बंद पडली तर ती पुन्हा सुरू केली जात नाही. सरकारने एनआरसी कंपनी अदानीला विकली. विकलेल्या जागेपैकी बहुतांश जागा ही सरकारची आहे. राज्यात मराठी माणसाचे सरकार आहे, असे असताना कामगारांची देणी न देता जमीन विकली कशी जाते? मात्र, या आधीच्या कंपनी व्यवस्थापनाने हजारो कोटी रुपये कर्ज बँकांकडून घेतले होते. ते कोण चुकते करणार? त्याची हमी अदानीने दिली आहे का, असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे. राज्यातील एखाद्या उद्योजकाला दिल्लीत मोदींच्या शेजारी बसावे वाटले तर ते होणार नाही. त्याला मोदी बगलेत घेणार नाहीत. मात्र, तोच उद्योजक जर गुजरातचा असेल तर त्याला लगेच मोदी बगलेत घेतील. केंद्रातील सरकार अंबानी, अदानीच्या बाजूचे असल्याचे ते पुढे म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. आंबेडकरांनी उपस्थितांना गर्दी करू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन केले. मात्र कार्यकर्ते व उपस्थित त्यांच्या आवाहनाला जुमानत नव्हते. याविषयी आंबेडकर यांनी संतापही व्यक्त केला.

---------------------------