शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

'नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून तर अंबानी, अदानीचा फायदा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 3:24 PM

नोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते. नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला.

ठळक मुद्देनोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते.नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून होता असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केला.

मीरारोड - नोटबंदी देशाच्या ७० वर्षातले सर्वात मोठे चुकीचे धोरण होते. नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचा फायदा झाला नाही तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. जिओचे फोन हे चीन मधून आले कसे ? नोटबंदी आधी त्यासाठी हवाल्याने पैसे पाठवले गेले. चौकीदारच चोर असून देशाचं वाटोळ करायला निघाले आहेत. नोटबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून होता असा घणाघात काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भार्इंदर येथे नोटबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनात भाजपा व मोदी सरकारवर केला आहे. 

नोटबंदीला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ हुसेन यांच्या नेतृत्त्वाखाली भार्इंदर पुर्वेच्या काँग्रेस कार्यालयापासुन गोडदेव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. भटजी आणून शास्त्रोक्त पध्दतीने मोदी सरकारचे श्राध्द घालण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेने जुबेर इनामदार, महिला जिल्हाध्यक्षा लिलाताई पाटील, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, सारा अक्रम सह अ‍ॅड. शफिक खान, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, राजकुमार मिश्रा, संदिप चौहान, प्रकाश नागणे आदी अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नोटबंदीच्या दोन वर्षानंतर सुध्दा सामान्य जनता, लहान उद्योजक-व्यापारी सर्वच वाईट परिस्थितीमध्ये आहेत. रोजगार, नोकऱ्या, व्यवसाय बुडाले. लोकांचे बळी गेले. दिवाळी त्यांची काळी ठरली आहे. कर्जबाजारी अनिल अंबानीला कागदाचे विमान बनवण्याचा अनुभव नसताना मोदींनी देशाच्या संरक्षणासाठी राफेल विमान बनवण्याचे कंत्राट दिले. हजारो कोटींचा हा घोटाळा असताना केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला सुध्दा विमानाची किंमत सांगायला तयार नाही. ४ वर्षात सत्ता असून राम मंदिर बांधले नाही आणि निवडणुक आल्यावर राम मंदिरचा मुद्दा उभा करुन तेढ वाढवतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत येतात. काँग्रेस शासनाने मंजुर केलेल्या मेट्रोचे नारळ फोडतात. मीरा भार्इंदरसाठी ७५ दशलक्ष पाणी काँग्रेसने मंजुर केले. त्याचे श्रेय घेता पण आजही त्यातले ३५ दशलक्ष लिटर पाणी सुध्दा आणता आले नाही. २४ तास पाणी देण्याचे फलक लावले आज लोकांना ४८ तासांवर पाणी मिळत आहे. आज पालिकेच्या कामांमध्ये २८ टक्के कमिशन खात आहेत. मोठा भ्रष्टाचार चालला आहे. शहरात फेरीवाले सुध्दा भाजपाने वाढवले. २०१२ मध्ये साडे तीन हजार फेरीवाले होते ते आज १८ हजार झाले आहेत. बाजार वसुली करणारे पण भाजपाचेच आहेत अशी टिकेची झोड उठवत खोटी आश्वासनं देणं, कमिशन खाणं हेच यांचे धंदे असल्याचा आरोप हुसेन यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर