शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

मंडईची वास्तू पडूनच; रहिवाशांना घ्यावी लागते डोंबिवलीत धाव

By admin | Updated: August 21, 2015 02:17 IST

वाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीवाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. केडीएमसी क्षेत्रातील एकमेव असा ९० फुटी रस्ता ही नव्याने ओळख असलेला हा वॉर्ड तुलनेने मोठाही आहे. नियोजनबद्ध इमारती-रस्ते या ठिकाणी तयार होत असतानाच मूलभूत गरजांसाठी मात्र या ठिकाणच्या नागरिकांना डोंबिवलीवरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे भाजी मंडईची प्रशस्त जागा असूनही केवळ महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे ती सुविधा मिळत नसल्याने महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होते.येथील मंगलकलश सोसायटीमध्ये मंडईसाठी महापालिकेची सुमारे १५०० स्क्वे. फूट ग्राउंड प्लस वन सुसज्ज जागा आहे. तेथे इमारतीचे काम पूर्ण झाले, नागरिक वास्तव्याला गेले, पाठोपाठ परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यात २४ तास पाण्याची सुविधा, डांबरीकरणाचे चांगले रस्ते आदी असले तरीही भाजी, मच्छी, किराणा या जीवनावश्यक बाबींसाठी नागरिकांना अद्यापही डोंबिवली अथवा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात १.५ ते २ किमी जावे लागते. वॉर्डाचा बहुतांशी भाग हा एमआयडीसी क्षेत्रालगत असल्याने प्रदूषणाचीही समस्या आहेच. अनेकदा संध्याकाळच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणे नकोसे होते, तशा अवस्थेत वर्षानुवर्षे लोक येथे राहतात. खंबाळपाड्यातच परिवहनचा मोठा भूखंड आहे, मात्र तेथेही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बसेस उभ्या राहण्याऐवजी कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहतात. असे असूनही या ठिकाणची कचरा निर्मूलनाची समस्या आहेच. लाखाच्या घरात असलेल्या वस्तीसाठी अवघे ६ सफाई कर्मचारी, तेही पूर्णपणे येत नाहीत. या ठिकाणी तीन स्मशानभूमी असून एक स्मशानभूमी अद्ययावत आहे, तर अन्य एका ठिकाणी २९ लाख खर्चून शोकसभागृह व १४ लाखांच्या लाद्या बसवण्यात येणार आहेत. सध्या तरी त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय असून तो गर्दुले व तळीरामांचा अड्डा बनला आहे. तिसरी रस्त्यालगत असून त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कृत्रिम तलाव असून या ठिकाणी बहुतांशी सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.परिवहन सेवेचा लाभही येथील नागरिकांना मिळत नाही. येथूनच हाकेच्या अंतरावर पेंढरकर महाविद्यालय, मंजूनाथ कनिष्ठ महा., सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर, क्रीडा संकुल, डोंबिवलीकरांचे भूषण असलेल्या कॅ. विनयकुमार सच्चान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला शौर्यगाथा सांगणारा ‘रणगाडा’, घरडा सर्कलचे फाउंटन आदी महत्त्वाची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, रात्री-अपरात्री नाटक सुटल्यावर बसची सुविधा नसल्याने रिक्षा, टॅक्सी वाहने शोधताना नागरिकांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे खंबाळ पाड्यातून ठाकुर्ली - डोंबिवलीसाठी मध्यरात्रीपर्यंत परिवहनची सुविधा असणे आवश्यक आहे.