शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Maharashtra Election 2019: प्रचारतोफा पावसाने थंडावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 1:42 AM

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, मोठ्या नेत्यांनी लावली हजेरी

ठाणे : गेले १४ दिवस ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुराळा आता खाली बसला असून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. पुढील ४८ तासांत छुप्या प्रचारावर सर्वच पक्षांच्या उमेदवारांचा भर असणार आहे. मात्र, शेवटचे दोन दिवस पावसाने उमेदवारांच्या प्रचारावर अक्षरश: पाणी फिरवले. त्यामुळे काही नेत्यांच्या सभा रद्द झाल्या, तर काही उमेदवारांना आपल्या प्रचारफेऱ्या गुंडाळाव्या लागल्या.

जिल्ह्यातील मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अशोक गहलोत, मनोज तिवारी, सुप्रिया सुळे, अजित पवार, विनोद तावडे, पीयूष गोयल, मनसेअध्यक्ष राज ठाकरे, ओवेसी आदी प्रमुख नेत्यांसह इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. यामध्ये सत्ताधारी भाजप, शिवसेनेने काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे आणि गेल्या पाच वर्षांत पूर्ण केलेल्या अथवा सुरू केलेल्या विकासकामांच्या बदल्यात मतांचा जोगवा मागितला. राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसने युती सरकारने मूलभूत सुविधांसह इतर महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष न देता कलम ३७० वरच कसा भर दिला, याचा समाचार घेतला.

पंतप्रधान मोदी यांनी पक्षात नव्याने आलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी नवी मुंबईत सभा घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाणे, उल्हासनगर येथे सभा झाल्या, तर कल्याण पूर्वेला त्यांनी धावती भेट दिली. भाजप कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही उल्हासनगरला हजेरी लावली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि विनोद तावडे यांनी ‘कॉफी विथ ठाणे’ या कार्यक्रमांतर्गत ठाण्याला भेट दिली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कल्याण पूर्वेत सभा घेतली. राजनाथ सिंह यांचा रोड शो मीरा-भाईंदरमध्ये झाला. उद्धव ठाकरे यांची प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ठाण्यात सभा झाली.

काँग्रेसच्या नेत्यांची प्रचाराकडे पाठ

जिल्ह्यात ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, भिवंडी, कल्याण, भिवंडी, मीरा-भाईंदर आदी ठिकाणी काँग्रेसच्या वतीने उमेदवार देण्यात आले आहेत. केवळ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीच मीरा-भाईंदरमध्ये सभा घेतली. मात्र, राज्यातील इतर नेत्यांनी ठाण्यातील मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

असा रंगला प्रचार...

प्रचारफेºया, रॅली, चौकसभा यावरच उमेदवारांनी अधिक भर दिल्याचे दिसून आले. शिवसेनेकडून भाजपबरोबर युती का केली, हे ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. क्लस्टरमुळे होणारे फायदे, राम मंदिर, ३७० कलम यावर सत्ताधाऱ्यांनी प्रचारात भर दिल्याचे दिसून आले. यातील होऊ घातलेल्या मेट्रो, जलवाहतूक व इतर प्रकल्पांचा प्रचारात ऊहापोह झाला.

मतदारांना बाहेर काढण्याची रणनिती

प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी आता पुढील ४८ तास छुपा प्रचार रंगणार आहे. यासाठी विविध पक्षांकडून प्रत्येक पदाधिकाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढविण्याबरोबरच तरुण मतदारांना बाहेर कसे काढायचे, यापूर्वी झोपडपट्टीमधील मतदार हा पटकन बाहेर पडत होता. आता मात्र चित्र बदलले असून इमारतींमधील मतदार बाहेर पडताना अधिक दिसत आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मतदारांना बाहेर काढण्यासाठी रणनीती निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस